शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सात दिवसांची संचारबंदी उठताच भाजी खरेदी-विक्रीसाठी उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ...

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. परंतु, सात दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी संचारबंदी उठविताच भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी व विक्रीसाठी एकच झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

मागील वीस-पंचवीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी संचारबंदी लागू केली होती. परंतु, कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढूच लागले होते. हे पाहून जिल्हा प्रशासनाने खबदारीचा उपाय म्हणून १ मार्च ते ७ मार्च या अशी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले होते. एवढे असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे मात्र फिरणे काही थांबत नव्हते. सात दिवस सुरु केलेल्या टाळेबंदीमुळे छोट्या व्यवसायिकांचे मात्र चांगलेच हाल झाले. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांना तर अर्धपोटीच उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

८ मार्चपासून नियम व अटी घालत संचारबंदी उठविली जाणार असल्याची माहिती कळताच भाजीमार्केटमध्ये छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजी खरेदी-विक्रीसाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील डिग्रस, जवळाबाजार, हट्टा, कुरुंदा, सेनगाव, पानकनेरगाव, औंढा, वारंगाफाटा, सवड, गोरेगाव, कन्हेरगावनाका, साखरा आदी ग्रामीण भागांतूृन भाजीपाला व्यवसायिकांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. शहरातील किरकोळ विक्रेते हे ठोक विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करताना पहायला मिळाले.

विनामास्क खरेदी-विक्री

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सुरुवातीपासून जिल्हा प्रशासन विनामास्क फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना देत आहे. परंतु, या सुचनांचा काही लोकांवर काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. सोमवारी तर भाजी मार्केटमध्ये विनामास्क खरेदी-विक्री केल्याचे पहायला मिळाले. बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी मास्क घालून पालेभाज्यांची विक्री करताना आढळून आले.

फोटो