शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सात दिवसांची संचारबंदी उठताच भाजी खरेदी-विक्रीसाठी उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. ...

हिंगोली: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. परंतु, सात दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी संचारबंदी उठविताच भाजीपाला मार्केटमध्ये भाजी खरेदी व विक्रीसाठी एकच झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

मागील वीस-पंचवीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी संचारबंदी लागू केली होती. परंतु, कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढूच लागले होते. हे पाहून जिल्हा प्रशासनाने खबदारीचा उपाय म्हणून १ मार्च ते ७ मार्च या अशी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले होते. एवढे असतानाही विनामास्क फिरणाऱ्यांचे मात्र फिरणे काही थांबत नव्हते. सात दिवस सुरु केलेल्या टाळेबंदीमुळे छोट्या व्यवसायिकांचे मात्र चांगलेच हाल झाले. दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांना तर अर्धपोटीच उपाशी झोपण्याची वेळ आली होती.

८ मार्चपासून नियम व अटी घालत संचारबंदी उठविली जाणार असल्याची माहिती कळताच भाजीमार्केटमध्ये छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजी खरेदी-विक्रीसाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील डिग्रस, जवळाबाजार, हट्टा, कुरुंदा, सेनगाव, पानकनेरगाव, औंढा, वारंगाफाटा, सवड, गोरेगाव, कन्हेरगावनाका, साखरा आदी ग्रामीण भागांतूृन भाजीपाला व्यवसायिकांनी भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. शहरातील किरकोळ विक्रेते हे ठोक विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करताना पहायला मिळाले.

विनामास्क खरेदी-विक्री

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने सुरुवातीपासून जिल्हा प्रशासन विनामास्क फिरु नका, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना देत आहे. परंतु, या सुचनांचा काही लोकांवर काहीच परिणाम होताना दिसून येत नाही. सोमवारी तर भाजी मार्केटमध्ये विनामास्क खरेदी-विक्री केल्याचे पहायला मिळाले. बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी मास्क घालून पालेभाज्यांची विक्री करताना आढळून आले.

फोटो