शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

आतापर्यंत ११ जण आले परदेशातून, इंग्लंडमधून कोणीही परतले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची खबरदारी मागील मार्च महिन्यापासून घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून फक्त ११ जण आल्याची नोंद ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची खबरदारी मागील मार्च महिन्यापासून घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून फक्त ११ जण आल्याची नोंद आहे. सुदैवाने यातील कोणीही बाधित आढळले नाही. ज्यांची माहिती प्रशासनाकडे प्राप्त झाली अथवा ज्यांनी स्वत:हून नोंदणी केली असेच हे लोक असून, इतरांनी मात्र परस्परच होम क्वारंटाइन राहून काळ काढल्याने भविष्यात प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच काळजी घेतली जात होती. त्यातच परदेशातून अथवा परराज्यातून आलेल्यांवर प्रशासनाचे लक्ष होते. मात्र परदेशातून आलेल्या केवळ ११ जणांचीच मार्चपासून आजपर्यंत नोंद झाली आहे. यातील काही जणांची नावे प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली होती. तर काही जणांनी परदेशातून आल्यानंतर स्वत: नोंद करून घेतली होती. यात दुबई १, फिलिपाईन्स ३, जर्मनी १, साैदी अरेबिया १, ऑस्ट्रेलिया २, कझाकिस्तान १ तर मालदीववरून आलेल्या दाेघांचा यात समावेश होता. यापैकी कुणीही बाधित आढळले नव्हते.

इंग्लंडमधून कोणीही आले नाही

जिल्ह्यात सध्या इंग्लंड अथवा इतर देशांतूनही कोणी आले नाही. सध्या कोरोना विषाणूने आपल्या रुपासह तीव्रतेतही बदल केल्याच्या बातम्या येत असल्याने विदेशातून येणाऱ्यांबाबत धास्ती बसली आहे. मात्र विमानाची उड्डाणेच रद्द झाली असून यापूर्वीही कुणी आल्याची नोंद नसल्याने हिंगोलीकरांना यापासून तेवढा धोका नाही.

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?

जिल्ह्यात विदेशातून आलेल्यांबाबत वरिष्ठ प्रशासनाकडूनच यादीसह माहिती अनेक जिल्ह्यांना मिळाली आहे. हिंगोलीत मात्र कोणी आले नसल्याने यादीही आली नाही. जर असा कोणी आला तर त्याचा नियमितपणे स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी तर होणारच आहे. याशिवाय पुणे येथेही पाठवून इतर विषाणू व विषाणूच्या स्वरूपाची माहिती घेतली जाणार आहे.