शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत ११ जण आले परदेशातून, इंग्लंडमधून कोणीही परतले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची खबरदारी मागील मार्च महिन्यापासून घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून फक्त ११ जण आल्याची नोंद ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची खबरदारी मागील मार्च महिन्यापासून घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून फक्त ११ जण आल्याची नोंद आहे. सुदैवाने यातील कोणीही बाधित आढळले नाही. ज्यांची माहिती प्रशासनाकडे प्राप्त झाली अथवा ज्यांनी स्वत:हून नोंदणी केली असेच हे लोक असून, इतरांनी मात्र परस्परच होम क्वारंटाइन राहून काळ काढल्याने भविष्यात प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच काळजी घेतली जात होती. त्यातच परदेशातून अथवा परराज्यातून आलेल्यांवर प्रशासनाचे लक्ष होते. मात्र परदेशातून आलेल्या केवळ ११ जणांचीच मार्चपासून आजपर्यंत नोंद झाली आहे. यातील काही जणांची नावे प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली होती. तर काही जणांनी परदेशातून आल्यानंतर स्वत: नोंद करून घेतली होती. यात दुबई १, फिलिपाईन्स ३, जर्मनी १, साैदी अरेबिया १, ऑस्ट्रेलिया २, कझाकिस्तान १ तर मालदीववरून आलेल्या दाेघांचा यात समावेश होता. यापैकी कुणीही बाधित आढळले नव्हते.

इंग्लंडमधून कोणीही आले नाही

जिल्ह्यात सध्या इंग्लंड अथवा इतर देशांतूनही कोणी आले नाही. सध्या कोरोना विषाणूने आपल्या रुपासह तीव्रतेतही बदल केल्याच्या बातम्या येत असल्याने विदेशातून येणाऱ्यांबाबत धास्ती बसली आहे. मात्र विमानाची उड्डाणेच रद्द झाली असून यापूर्वीही कुणी आल्याची नोंद नसल्याने हिंगोलीकरांना यापासून तेवढा धोका नाही.

विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?

जिल्ह्यात विदेशातून आलेल्यांबाबत वरिष्ठ प्रशासनाकडूनच यादीसह माहिती अनेक जिल्ह्यांना मिळाली आहे. हिंगोलीत मात्र कोणी आले नसल्याने यादीही आली नाही. जर असा कोणी आला तर त्याचा नियमितपणे स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी तर होणारच आहे. याशिवाय पुणे येथेही पाठवून इतर विषाणू व विषाणूच्या स्वरूपाची माहिती घेतली जाणार आहे.