शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

शासनाने सरसकट पिक विमा देण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका तक्रार समिती माहिती जिल्हा कृषी कार्यालय येथे लावण्यात यावी, ...

शासनाने सरसकट पिक विमा देण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका तक्रार समिती माहिती जिल्हा कृषी कार्यालय येथे लावण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षापासून शेतकरी विविध कंपन्यामध्ये पिक विमा भरत आहेत. मात्र सलग तीन वर्षे नुकसान झाल्यानंतरही ‘पिकविमा कंपन्या’ शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देत नसून शेतकऱ्यांची केवळ थट्टा करीत आहे. त्यामुळे तीन वर्षापासूनचा विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिक विमा परताव्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जिल्हा कृषी अधीक्षक लोखंडे यांना धारेवर धरले होते. वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता. बऱ्याच वेळानंतर कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत निश्चित होणारी नुकसानभरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. त्यानुसार विमा संबंधित मंडळास लागू करण्यात येईल. सदर हंगामातील सोयाबीन पिकांचे संकलन नोंदवही कृषी आयुक्तलयास सादर केली आहे. तसेच सन २०१९- २० मधील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांची यादी बजाज अलायन्स कंपनीस पाठविण्यात आली आहे. व नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीचे राहील. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची यादी पाठविण्यात येईल असे पत्र आंदोलकांना कृषी अधीक्षकांनी दिले आहे.

संघटनेतर्फे यापूर्वीच दिला होता आंदोलनाचा इशारा

याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांना यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन पिक विमा परताव्याची मागणी केली होती. शिवाय आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता. परंतु मागणी मान्य न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गाडे, रावसाहेब अडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, नारायण सावके, बाबुराव मगर, दीपक सावके माधव सावके यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.