शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

शासनाने सरसकट पिक विमा देण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका तक्रार समिती माहिती जिल्हा कृषी कार्यालय येथे लावण्यात यावी, ...

शासनाने सरसकट पिक विमा देण्यात यावा तसेच जिल्हा व तालुका तक्रार समिती माहिती जिल्हा कृषी कार्यालय येथे लावण्यात यावी, यासह विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षापासून शेतकरी विविध कंपन्यामध्ये पिक विमा भरत आहेत. मात्र सलग तीन वर्षे नुकसान झाल्यानंतरही ‘पिकविमा कंपन्या’ शेतकऱ्यांना पीक विमा परतावा देत नसून शेतकऱ्यांची केवळ थट्टा करीत आहे. त्यामुळे तीन वर्षापासूनचा विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिक विमा परताव्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जिल्हा कृषी अधीक्षक लोखंडे यांना धारेवर धरले होते. वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता. बऱ्याच वेळानंतर कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत निश्चित होणारी नुकसानभरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. त्यानुसार विमा संबंधित मंडळास लागू करण्यात येईल. सदर हंगामातील सोयाबीन पिकांचे संकलन नोंदवही कृषी आयुक्तलयास सादर केली आहे. तसेच सन २०१९- २० मधील पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांची यादी बजाज अलायन्स कंपनीस पाठविण्यात आली आहे. व नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीचे राहील. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची यादी पाठविण्यात येईल असे पत्र आंदोलकांना कृषी अधीक्षकांनी दिले आहे.

संघटनेतर्फे यापूर्वीच दिला होता आंदोलनाचा इशारा

याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांना यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन पिक विमा परताव्याची मागणी केली होती. शिवाय आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता. परंतु मागणी मान्य न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गाडे, रावसाहेब अडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, नारायण सावके, बाबुराव मगर, दीपक सावके माधव सावके यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.