शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

साहेब, रेमडेसिविर इंजेक्शन तत्काळ पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शनचा हिंगोली जिल्ह्यातील एकाही स्टॉकिस्टकडे पत्ता नाही. मात्र, या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडेच ...

हिंगोली : रेमडेसिविर इंजेक्शनचा हिंगोली जिल्ह्यातील एकाही स्टॉकिस्टकडे पत्ता नाही. मात्र, या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडेच इंजेक्शन असल्याचे समजून अनेकजण या अधिकाऱ्यांनाच मोबाईलवरून संपर्क करून भांडावून सोडत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा शासकीय रुग्णालय व जिल्ह्यातील अधिकृत कोविड हॉस्पिटललाच पुरवठा व्हावा, यासाठी नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यांनी रोज स्टॉकिस्टकडून आढावा घेऊन त्यांच्याकडे उपलब्ध झालेल्या इंजेक्शनचा पुरवठा कुणाला केला अथवा करायचा, यावर नियंत्रण ठेवायचे आहे. मात्र, काही जणांनी व्हॉटस् ॲप ग्रुपवर रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे असल्यास मदतीसाठी मोबाईल क्रमांकासह या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. पाहता पाहता ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की, या अधिकाऱ्यांना रात्री-बेरात्रीही फोन करून लोक भांडावून सोडत आहेत. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा पत्र काढून ही समिती फक्त नियंत्रणासाठी आहे, इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी हा उपाय केल्याचे सांगावे लागले.

जिल्ह्यातील एकाही स्टॉकीस्टकडे मागील दोन दिवसांपासून इंजेक्शन उपलब्ध नाहीत. एका दिवशी ४० इंजेक्शन उपलब्ध झाले होते. त्यातील चार एका खासगी सेंटरला तर उर्वरित जिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर इंजेक्शनच मिळत नाहीत. आता हे इंजेक्शन कधी येतील, हे सांगणे अवघड आहे. रोजच ते आज किंवा उद्या मिळतील, एवढेच उत्तर ऐकायला मिळत आहे. यावर रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान हाेत नाही. इतर पर्यायी औषधांचा वापर आरोग्य विभागाकडून होत असला तरीही नातेवाईकांना रेमडेसिविरच हवे आहे. अनेकांचा एचआरसीटी स्कोअर तर दहाच्या खाली असतानाही रेमडेसिविरसाठी नातेवाईकांची टोळी कामाला लागल्याचे दिसते. ज्यांचा स्कोअर धाेक्याच्या पातळीचा आहे, अशांपेक्षा जास्त ही मंडळी बाजारपेठेत जास्त चौकशा करत फिरत आहे. तर नांदेड, परभणी, वाशिमला जादा दामात इंजेक्शन मिळत असल्याच्या अफवा मग आपोआप लोकांना कामाला लावत आहेत. या इंजेक्शनच्या उपयोगीतेबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मात्र, नातेवाईकांना हे इंजेक्शन संजीवनी वाटत असल्याने टंचाईचे हे रूप रौद्र बनत चालले आहे.