शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

साहेब, माझा बाप मरेल हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही ...

या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही उठता येत नाही. रोज बाहेरून औषधी आणावी लागते. मग आम्ही नसल्यावर ती कोण आणणार? आम्हाला क्वारंटाईन केले तर त्यांच्याकडे कोण बघणार? असा सवाल केला. मात्र कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तुम्हालाही कोरोना होईल. तुम्ही चाचणी न करताच बाहेर फिरता त्यामुळे इतरांमध्ये संसर्ग पसरत आहे. त्यामुळेच रुग्ण वाढत आहेत. म्हणून थेट क्वारंटाईनमध्ये जा, आता जास्तीचा स्टाफ नियुक्त केला. तुमच्या रुग्णांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे सांगितले. परंतु यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. तरीही नाईलाजाने त्यांनी क्वारंटाईनचा रस्ता धरला.

... तर रुग्णसंख्या अर्ध्यावर येईल

नातेवाईकांच्या गरजेच्या वेळी स्टाफ राहत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास राहिला नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, आता प्रत्येक शिफ्टमध्ये २० परिचारिका व १० वॉर्डबॉय नेमले आहेत. एका वाॅर्डात किमान तीन कर्मचारी राहतील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी ही काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय आता डॉक्टरही वाढले आहेत. नातेवाईक असले की ते जास्त गडबड करतात. इतर गंभीर रुग्णांची तपासणी सुरू असताना आमच्या रुग्णाकडे चला, असा हट्ट धरतात. यात दोन्हींकडून नुकसान होत आहे. तर नातेवाईक रुग्ण शेजारी असला की आमचा स्टाफही त्याकडे वारंवार पाहत नाही. आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचे समजतो. मात्र आता स्टाफने प्रत्येकावर २४ तास चांगले लक्ष ठेवले पाहिजे, अशा कडक सूचना दिल्या. रोज ४ राऊंड बंधनकारक केले. यात एक फिजिशियनचा राहणार आहे.

खाजगी रुग्णालयात रुग्ण अत्यावस्थ होतोय

अनेक रुग्ण आधी खासगी रुग्णालयात अथवा इतर जिल्ह्यात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातही खासगी रुग्णालयात अधिक प्रकृती बिघडलेले रुग्ण नंतर येथे येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना वाचविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातील काही जगत आहेत तर काहींना धोका होत आहे. त्यामुळे रुग्णांनी ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य निर्णय घेऊन योग्य ठिकाणी दाखल झाले पाहिजे. अन्यथा आम्हीही काही करू शकत नाही, असेही जयवंशी म्हणाले.

आता ७० टक्के अत्यावस्थ रुग्ण येताहेत

पूर्वी १० ते १२ टक्के अत्यावस्थ रुग्ण शासकीय रुग्ण संस्थेत यायचे. आता ६० ते ७० टक्के रुग्ण अत्यावस्थ झाल्यावरच या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे एवढे दिवस वाया का घालवले जात आहेत, हे कळायला मार्ग नाही. वेळेत तपासणी व उपचारामुळे हे टाळणे शक्य आहे. बेड उपलब्ध नसताना इतर जिल्ह्यांत जाऊन आलेले किंवा इतर जिल्ह्याचेच येथे येणारे रुग्ण अत्यावस्थ राहात असून ते वेळेत न आल्याने दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.