शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

साहेब, माझा बाप मरेल हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही ...

या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही उठता येत नाही. रोज बाहेरून औषधी आणावी लागते. मग आम्ही नसल्यावर ती कोण आणणार? आम्हाला क्वारंटाईन केले तर त्यांच्याकडे कोण बघणार? असा सवाल केला. मात्र कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तुम्हालाही कोरोना होईल. तुम्ही चाचणी न करताच बाहेर फिरता त्यामुळे इतरांमध्ये संसर्ग पसरत आहे. त्यामुळेच रुग्ण वाढत आहेत. म्हणून थेट क्वारंटाईनमध्ये जा, आता जास्तीचा स्टाफ नियुक्त केला. तुमच्या रुग्णांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे सांगितले. परंतु यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. तरीही नाईलाजाने त्यांनी क्वारंटाईनचा रस्ता धरला.

... तर रुग्णसंख्या अर्ध्यावर येईल

नातेवाईकांच्या गरजेच्या वेळी स्टाफ राहत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास राहिला नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, आता प्रत्येक शिफ्टमध्ये २० परिचारिका व १० वॉर्डबॉय नेमले आहेत. एका वाॅर्डात किमान तीन कर्मचारी राहतील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी ही काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय आता डॉक्टरही वाढले आहेत. नातेवाईक असले की ते जास्त गडबड करतात. इतर गंभीर रुग्णांची तपासणी सुरू असताना आमच्या रुग्णाकडे चला, असा हट्ट धरतात. यात दोन्हींकडून नुकसान होत आहे. तर नातेवाईक रुग्ण शेजारी असला की आमचा स्टाफही त्याकडे वारंवार पाहत नाही. आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचे समजतो. मात्र आता स्टाफने प्रत्येकावर २४ तास चांगले लक्ष ठेवले पाहिजे, अशा कडक सूचना दिल्या. रोज ४ राऊंड बंधनकारक केले. यात एक फिजिशियनचा राहणार आहे.

खाजगी रुग्णालयात रुग्ण अत्यावस्थ होतोय

अनेक रुग्ण आधी खासगी रुग्णालयात अथवा इतर जिल्ह्यात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातही खासगी रुग्णालयात अधिक प्रकृती बिघडलेले रुग्ण नंतर येथे येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना वाचविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातील काही जगत आहेत तर काहींना धोका होत आहे. त्यामुळे रुग्णांनी ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य निर्णय घेऊन योग्य ठिकाणी दाखल झाले पाहिजे. अन्यथा आम्हीही काही करू शकत नाही, असेही जयवंशी म्हणाले.

आता ७० टक्के अत्यावस्थ रुग्ण येताहेत

पूर्वी १० ते १२ टक्के अत्यावस्थ रुग्ण शासकीय रुग्ण संस्थेत यायचे. आता ६० ते ७० टक्के रुग्ण अत्यावस्थ झाल्यावरच या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे एवढे दिवस वाया का घालवले जात आहेत, हे कळायला मार्ग नाही. वेळेत तपासणी व उपचारामुळे हे टाळणे शक्य आहे. बेड उपलब्ध नसताना इतर जिल्ह्यांत जाऊन आलेले किंवा इतर जिल्ह्याचेच येथे येणारे रुग्ण अत्यावस्थ राहात असून ते वेळेत न आल्याने दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.