शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, माझा बाप मरेल हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:32 IST

या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही ...

या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप आर्जव केली. प्रतिभा पोले, घुगे, समीना शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून आमच्या नातेवाईकांना जागचे ही उठता येत नाही. रोज बाहेरून औषधी आणावी लागते. मग आम्ही नसल्यावर ती कोण आणणार? आम्हाला क्वारंटाईन केले तर त्यांच्याकडे कोण बघणार? असा सवाल केला. मात्र कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने तुम्हालाही कोरोना होईल. तुम्ही चाचणी न करताच बाहेर फिरता त्यामुळे इतरांमध्ये संसर्ग पसरत आहे. त्यामुळेच रुग्ण वाढत आहेत. म्हणून थेट क्वारंटाईनमध्ये जा, आता जास्तीचा स्टाफ नियुक्त केला. तुमच्या रुग्णांची जबाबदारी त्यांच्यावर आहे, असे सांगितले. परंतु यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. तरीही नाईलाजाने त्यांनी क्वारंटाईनचा रस्ता धरला.

... तर रुग्णसंख्या अर्ध्यावर येईल

नातेवाईकांच्या गरजेच्या वेळी स्टाफ राहत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास राहिला नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, आता प्रत्येक शिफ्टमध्ये २० परिचारिका व १० वॉर्डबॉय नेमले आहेत. एका वाॅर्डात किमान तीन कर्मचारी राहतील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी ही काळजी करण्याचे कारण नाही. शिवाय आता डॉक्टरही वाढले आहेत. नातेवाईक असले की ते जास्त गडबड करतात. इतर गंभीर रुग्णांची तपासणी सुरू असताना आमच्या रुग्णाकडे चला, असा हट्ट धरतात. यात दोन्हींकडून नुकसान होत आहे. तर नातेवाईक रुग्ण शेजारी असला की आमचा स्टाफही त्याकडे वारंवार पाहत नाही. आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचे समजतो. मात्र आता स्टाफने प्रत्येकावर २४ तास चांगले लक्ष ठेवले पाहिजे, अशा कडक सूचना दिल्या. रोज ४ राऊंड बंधनकारक केले. यात एक फिजिशियनचा राहणार आहे.

खाजगी रुग्णालयात रुग्ण अत्यावस्थ होतोय

अनेक रुग्ण आधी खासगी रुग्णालयात अथवा इतर जिल्ह्यात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातही खासगी रुग्णालयात अधिक प्रकृती बिघडलेले रुग्ण नंतर येथे येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना वाचविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातील काही जगत आहेत तर काहींना धोका होत आहे. त्यामुळे रुग्णांनी ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य निर्णय घेऊन योग्य ठिकाणी दाखल झाले पाहिजे. अन्यथा आम्हीही काही करू शकत नाही, असेही जयवंशी म्हणाले.

आता ७० टक्के अत्यावस्थ रुग्ण येताहेत

पूर्वी १० ते १२ टक्के अत्यावस्थ रुग्ण शासकीय रुग्ण संस्थेत यायचे. आता ६० ते ७० टक्के रुग्ण अत्यावस्थ झाल्यावरच या रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे एवढे दिवस वाया का घालवले जात आहेत, हे कळायला मार्ग नाही. वेळेत तपासणी व उपचारामुळे हे टाळणे शक्य आहे. बेड उपलब्ध नसताना इतर जिल्ह्यांत जाऊन आलेले किंवा इतर जिल्ह्याचेच येथे येणारे रुग्ण अत्यावस्थ राहात असून ते वेळेत न आल्याने दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.