शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संचारबंदीतही मांडले दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. असे असताना शहरातील एका माठ ...

हिंगोली: कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. असे असताना शहरातील एका माठ विक्रेत्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चक्क संचारबंदीतही दुकान मांडले. दुपारी ४ वाजेपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याच्या पदरात दोनशे पडले.

कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याचे पाहून राज्य शासनाने १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाने गत दीड वर्षापासून छळ मांडला आहे. एप्रिल आणि मे हे दोनच महिने कुंभार व्यावसायिकांसाठी उदरनिर्वासाठीचे साधन आहे. परंतु, याच महिन्यात कोरोनाने कहर मांडला आहे. त्यामुळे याही महिन्यात माठ विक्री होत नाही. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने घरात अन्नाचा कणही नाही. विशेष घरात लहान-मोठे सहा-सात सदस्य आहेत. त्यांचे पोट कसे भरावे, हा प्रश्न कुंभार व्यावसायिकापुढे पडला आहे. २० एप्रिलपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकाने उघडी ठेवण्याचे शासन जाहीर केले. हे पाहून एका माठ व्यावसायिकानेही शहरातील गांधी चौकात १० ते १२ माठ आणून दुकान मांडले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यत त्याने ग्राहकांची प्रतीक्षा केली. संचारबंदीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. एक-दोन ग्राहकांनी माठांची किंमतही विचारली; पण माठ विकत घेतला नाही. दुपारी ४ वाजेपर्यंत दुकान मांडल्यानंतर घरचा रस्ता धरण्याचे ठरिवले. माठांची आवराआवर केली. निघतेवेळी का होईना २०० रुपयांचा माठ विक्री झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

कोरोना महामारीने दीड वर्षापासून छळ मांडला आहे. बाहेरगावीही माठ विक्री करायला जाता येत नाही. कोरोना आधी बाहेरगावी माठ विक्री करायला जात होतो. यावेळेस तेही शक्य होत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घराचा गाडा माठ विक्रीवरच आहे. परंतु, तोही कोरोनाने हिसकावून घेतला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी.

- राधेश्याम पेरिया, माठ विक्रेता

फोटो नंबर ३