शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शिरड ग्रा. पं. चाैकशीनंतर येथील कारभार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या कामांची पथकांच्या वतीने चाैकशी केली. यानंतर येथील ग्रामविकास अधिकारी यांनी ...

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर ग्रामपंचायततर्फे करण्यात आलेल्या कामांची पथकांच्या वतीने चाैकशी केली. यानंतर येथील ग्रामविकास अधिकारी यांनी रजेचे अस्त्र वापरत यातून सुटका मिळविण्यात येथील कारभारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतचा कारभार ठेपाळला असून गावात अनेक ठिकाणी दुर्गंधी व मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.

शिरडशहापूर येथील ग्रामविकास अधिकारी २५ दिवसांपासून रजेवर आहेत. तसेच येथील कर्मचारी यांचे वेतन मिळाले नसल्याने ग्रामपंचायतचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे गावातील दैनदिन कामे करण्यात येत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील पदभार गटविकास अधिकारी यांच्याकडे आहे. मात्र तालुकातील विविध कामे असल्याने येथील कामाकडे पूर्णवेळ लक्ष देता येत नाही. तसेच येथील ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी लाॅकडाऊन काळात १ कोटी ३० लाख रुपयांची विविध विकास कामे केली. ही कामे बरोबर झाली नसल्यामुळे या कामाच्या चौकशीसाठी समिती नेमली. १८ डिसेंबर रोजी चौकशी समितीला सामोरे जाऊन यानंतर ग्रामविकास अधिकारी अशोक इंगळे हे गावाकडे फिरकले नाहीत. त्यातच सफाई कामगारांचे मानधन थकल्यामुळे सफाई कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून कामावर नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात कचरा भरलेली घंटागाडी दहा दिवसांपासून उभी आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी कचरा आणून टाकल्यामुळे परिसरात सर्वंत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जवळच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, माझी शारीरिक प्रकृती ठिक नसल्यामुळे काही दिवस सुट्टी घेतली आहे. यानंतर याबाबत गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता, तुमच्या गावाचा पदभार कोणताचं ग्रामसेवक घेण्यास तयार नाही. तुम्ही सांगा तो ग्रामसेवक तुम्हाला देतो, असे त्यांनी सांगितले. मागील २५ दिवसांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे विविध कामे खोळंबली आहेत. गावात सर्वत्र कचऱ्यांचे ढीग जमा झाल्यामुळे सर्वंत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथे तत्काळ ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांतून हाेत आहे. फाेटाे नं. १०