शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात औषधींसाठी रुग्णांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST

हिंगोली: सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यास पैसा लागत नाही, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. परंतु, तेथेही औषधी मिळत नसून ते बाहेरून ...

हिंगोली: सरकारी दवाखान्यात उपचार घेतल्यास पैसा लागत नाही, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. परंतु, तेथेही औषधी मिळत नसून ते बाहेरून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे सद्य:स्थितीत पहायला मिळत आहे.

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात संसर्ग, अस्थिरोग, नेत्ररोग, अपघात विभाग, प्रसूती विभाग, स्त्री वैद्यकीय चिकित्सा विभाग, पुरुष विभाग, इंजेक्शन विभाग, बालरोग, कान-नाक-घसा अशा सात-आठ ओपीडी आहेत. जिल्हा रुग्णालयात नाही म्हटले तरी तीनशे ते साडेतीनशे रोजची ओपीडी असते. महागडी औषधी बाहेर परवडत नाही, खासगी दवाखान्यात राहून रोगांवर इलाज करणेही शक्य होत नाही. काळजीपोटी रुग्णांसोबत त्याचे एक-दोन तरी नातेवाईक आलेले असतात. अशावेळी खासगी दवाखान्यात राहण्याची पंचाईत होते. ऑटोरिक्षाचा खर्च, लॉजचा खर्च हे तर डोकेदुखी होऊन बसते. म्हणून तर सर्वसामान्य नागरिक सरकारी दवाखान्यात रुग्णांना घेऊन जातात. परंतु, तेथेही बाहेरुन औषधी विकत आणावी लागत असेल तर सरकारी दवाखाना काय कामाचा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

१४ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फेरफटका मारला असता आणि रुग्णांशी विचारणा केली असता सत्यता बाहेर आली. रुग्णांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

औषधी बाहेरुन आणणे परवडत नाही

सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांचा आहे.

आपला दवाखाना म्हणून आम्ही रुग्णाला घेऊन येतो. परंतु, दवाखान्यात भरती होऊन दोन दिवस झाले की, तिसऱ्या दिवशी डॉक्टर येतात आणि औषधीची चिठ्ठी लिहून देतात. ‘बाहेरुन औषधी आणा’, असे म्हणून निघून जातात. मग अशावेळेस आम्ही काय करायचे? असा प्रश्नही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.

रुग्णाजवळ बसावे की औषधी आणावी?

रुग्ण आमचा गंभीर असतो. रुग्णाजवळ बसणे अगत्याचे असते. डॉक्टरांना हे माहितीसुद्धा असते. परंतु, ते औषधीची चिठ्ठी देवून मोकळे होतात. सकाळी राऊंडला येतात आणि दुपारच्यावेळी तपासणीला आल्यानंतर औषधीची चिठ्ठी हातात ठेवतात आणि सांगतात, आमच्याकडे औषधी नाही तुम्ही बाहेरुन मेडिकलवरुन औषधी आणा. अशावेळी नाईलाज असतो. रुग्णाला एकट्याला बसवून औषधी घेऊन येतो.

चिठ्ठी तपासणीची की औषधीची?

बहुतांशवेळा डॉक्टर आत आले की, चिठ्ठी तपासणीची आहे की, औषधीची हेही कळत नाही. राऊंडला ज्यावेळी डॉक्टर येतात तेव्हा ते सांगतात तुम्हाला चिठ्ठी दिली आहे. त्यावरील औषधी तुम्ही बाहेरच्या मेडिकलवरुन विकत आणा. इथे दवाखान्यात ती उपलब्ध नाही. मग आम्ही अशावेळी विचार करतो, रुग्णाचे बरेवाईट होण्यापेक्षा ती विकत आणलेली बरी, असे म्हणून औषधी विकत आणतो.

...तर त्यांच्यावर केली जाईल कार्यवाही

जिल्हा सरकारी दवाखाना हा सर्वसामान्यांचा आहे. काही रुग्णांच्या तक्रारीही औषधी विकत आणावी लागत अशाच आहेत. जिल्हा सामाान्य रुग्णालयात सर्व औषधी मोफत उपलब्ध असतानाही बाहेरून का विकत आणावी लागत आहेत, हाच मोठा प्रश्न आहे. जो कोणी माझ्याशी विचारपूस न करता परस्पर रुग्णाला औषधी लिहून देत असेल तर ते योग्यच नाही. यापुढे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल. एवढेच नाहीतर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. रुग्णांची विचारपूस आणि त्यांना औषधी पुरविणे हे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कामच आहे.-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली

फोटो आहे