शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळत बस, रेल्वे यासह विमानसेवा सुरू झाली ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळत बस, रेल्वे यासह विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच सर्व व्यवहारही सुरळीत झाले आहेत. मात्र महाविद्यालये सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विविध शाखांच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात होता. सध्या काही महाविद्यालयातून ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी अनेक भागात नेटवर्कचा प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. तसेच ऑनलाइन अभ्यास कंटाळवाणा वाटत असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता महाविद्यालये कधी सुरू होणार याकडेच पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

९९ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर ही जिल्हे येतात. चार जिल्ह्यात मिळून कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक शास्र, पत्रकारिता आदी शाखा असलेली जवळपास ३६० महाविद्यालये आहेत. यात ९९ हजार ५००च्या वर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात विविध अभ्यासक्रम शिकविणारे ३७ महाविद्यालये आहेत. कोरोनामुळे बंद असलेली ही महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

महाविद्यालये बंद असल्याने अभ्यास बुडत आहे. महाविद्यालयाकडून ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी ऑनलाइन अभ्यास समजण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरू व्हावीत.

- प्रशांत कऱ्हाळे, विद्यार्थी

जिल्ह्यातील शाळा यासह इतर व्यवहारही सुरू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयेही सुरू व्हायला पाहिजेत. ग्रामीण भागात नेटवर्क राहत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्याकडे ॲण्ड्राइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन अभ्यासही करता येत नाही.

-विनायक डांगे, विद्यार्थी

ऑनलाइन अभ्यास कंटाळवाणा ठरत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकविलेले जास्त लक्षात राहते. शाळा सुरू झाल्या तसेच बसेसही धावत आहेत. महाविद्यालये सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचा अभ्यासही पूर्ण होईल.

- कैलास मुकाडे, विद्यार्थी

महाविद्यालये बंद असल्याने देशाचे भविष्य असलेली युवापिढीच्या क्षमतांना वाव मिळण्यास अडथळा ठरत आहे. नियम पाळून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. तरीही महाविद्यालये बंद ठेवून शासनाला नेमके काय सिद्ध करायचे. महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश तातडीने काढावेत.

- सौरभ करंडे, विद्यार्थी