शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली; मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

हिंगोली : ग्रामपंचायत व पालकांच्या एनओसीनंतर कोरोनामुक्त भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांच्या ...

हिंगोली : ग्रामपंचायत व पालकांच्या एनओसीनंतर कोरोनामुक्त भागातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यायची कोणी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली. दुसऱ्या लाटेने तर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे यावर्षी तरी शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, अनेक गावे कोरोनामुक्त झाल्याने पुन्हा शाळा सुरू होण्याची आशा निर्माण झाली. आता तर जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. असे असले तरी ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग काही दिवसांपासून सुरू झाले आहेत. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्यासाठी पालक व ग्रामपंचायतीची एनओसी आवश्यक करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात टप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात अहवाल शिक्षण विभागाकडे दाखल हेात आहेत. आतापर्यंत १२३ शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा उत्साह दिसून येत असला तरी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. शाळांकडून कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत; परंतु सॅनिटायझर, मास्क महत्त्वाचे असल्याने यासाठी विद्यार्थ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शाळा सुरू करण्यापूर्वी वर्ग सॅनिटायझेशन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, वर्ग सॅनिटायझेशन करण्यासाठीचे पैसे कोण देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सध्या तरी वर्ग सॅनिटायझेशन करण्याचा खर्च शाळा प्रशासनाला उचलावा लागत आहे.

तोंडी आदेशामुळे मुख्याध्यापकांसमोर पेच

मुले शाळेत आल्यानंतर त्यांची काळजी घेणे शाळेची जबाबदारी आहे. मात्र, शाळेबाहेर मुलांवर कसे लक्ष ठेवणार, असा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित होत आहे.

-विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले होते. मात्र, अनेकांकडे मोबाइल व नेटवर्कचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते.

- त्यामुळे शाळा प्रत्यक्ष कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी

जिल्ह्यात १२३ शाळा सुरू

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली - २२८५२

दुसरी - २३१८५

तिसरी -२२११२

चौथी - २१८७४

पाचवी - २१३४२

सहावी - २१०३४

सातवी - २०७४०

आठवी - २०५३५

नववी - १९५१९

दहावी - १९४०७