शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर वाळूचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गतिरोधक बसविण्याची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक ...

गतिरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या संबंधित विभागाने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा मागील १५-२० दिवसापासून सतत खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांंना शक्य होत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘जड वाहनांना प्रवेशबंदी करा’

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागामध्ये जड वाहनांंना प्रवेशबंदी असतानाही जड वाहने सर्रास आणली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही यावर कारवाई होत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन जड वाहनांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

‘थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करावे’

हिंगोली : गत काही दिवसापासून किमान तापमानात झालेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदान्याचे पडदे लावणे गरजेचे आहे. पडदे लावल्यास पहाटेच्या थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षण होईल. कोंबड्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

किडीचा नायनाट करण्यासाठी फवारणीचा सल्ला

हिंगोली : वांगी, मिरची, भेंडी, कोबी व इतर पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी पायरीप्रॉक्झीफेम ५ टक्के, फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के १० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी सायांट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

‘फुलामध्ये वेळच्यावेळी पाणीव्यवस्थापन करावे’

हिंगोली : फूल पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणीव्यवस्थापन वेळच्यावेळी करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी वेळेवर करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.