शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

रस्त्यावर वाळूचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गतिरोधक बसविण्याची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक ...

गतिरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या संबंधित विभागाने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा मागील १५-२० दिवसापासून सतत खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांंना शक्य होत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘जड वाहनांना प्रवेशबंदी करा’

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागामध्ये जड वाहनांंना प्रवेशबंदी असतानाही जड वाहने सर्रास आणली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही यावर कारवाई होत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन जड वाहनांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

‘थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करावे’

हिंगोली : गत काही दिवसापासून किमान तापमानात झालेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदान्याचे पडदे लावणे गरजेचे आहे. पडदे लावल्यास पहाटेच्या थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षण होईल. कोंबड्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

किडीचा नायनाट करण्यासाठी फवारणीचा सल्ला

हिंगोली : वांगी, मिरची, भेंडी, कोबी व इतर पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी पायरीप्रॉक्झीफेम ५ टक्के, फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के १० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी सायांट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

‘फुलामध्ये वेळच्यावेळी पाणीव्यवस्थापन करावे’

हिंगोली : फूल पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणीव्यवस्थापन वेळच्यावेळी करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी वेळेवर करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.