शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

रस्त्यावर वाळूचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गतिरोधक बसविण्याची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक ...

गतिरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या संबंधित विभागाने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा मागील १५-२० दिवसापासून सतत खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांंना शक्य होत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘जड वाहनांना प्रवेशबंदी करा’

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागामध्ये जड वाहनांंना प्रवेशबंदी असतानाही जड वाहने सर्रास आणली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही यावर कारवाई होत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन जड वाहनांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

‘थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करावे’

हिंगोली : गत काही दिवसापासून किमान तापमानात झालेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदान्याचे पडदे लावणे गरजेचे आहे. पडदे लावल्यास पहाटेच्या थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षण होईल. कोंबड्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

किडीचा नायनाट करण्यासाठी फवारणीचा सल्ला

हिंगोली : वांगी, मिरची, भेंडी, कोबी व इतर पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी पायरीप्रॉक्झीफेम ५ टक्के, फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के १० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी सायांट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

‘फुलामध्ये वेळच्यावेळी पाणीव्यवस्थापन करावे’

हिंगोली : फूल पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणीव्यवस्थापन वेळच्यावेळी करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी वेळेवर करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.