शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

रस्त्यावर वाळूचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

गतिरोधक बसविण्याची मागणी हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक ...

गतिरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणी गतिरोधक व दुभाजक नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी या ठिकाणी नगर परिषदेच्या संबंधित विभागाने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कळमनुरी : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा मागील १५-२० दिवसापासून सतत खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांंना शक्य होत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच याची दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘जड वाहनांना प्रवेशबंदी करा’

हिंगोली : शहरातील गांधी चौक, महावीर चौक, इंदिरा चौक आदी भागामध्ये जड वाहनांंना प्रवेशबंदी असतानाही जड वाहने सर्रास आणली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगूनही यावर कारवाई होत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन जड वाहनांना प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.

‘थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करावे’

हिंगोली : गत काही दिवसापासून किमान तापमानात झालेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदान्याचे पडदे लावणे गरजेचे आहे. पडदे लावल्यास पहाटेच्या थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षण होईल. कोंबड्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

किडीचा नायनाट करण्यासाठी फवारणीचा सल्ला

हिंगोली : वांगी, मिरची, भेंडी, कोबी व इतर पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी पायरीप्रॉक्झीफेम ५ टक्के, फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के १० मिली किंवा डायमिथोएट ३० टक्के १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषण करणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी सायांट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने शेतकऱ्यांना दिला आहे.

‘फुलामध्ये वेळच्यावेळी पाणीव्यवस्थापन करावे’

हिंगोली : फूल पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणीव्यवस्थापन वेळच्यावेळी करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी वेळेवर करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.