शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

वाळू कंत्राटदारांची पूर्णा नदीवरील घाटांनाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यातील एकूण ३२ वाळू घाटांच्या लिलावासाठी निविदा काढली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ घाट लिलावात गेले आहेत. यामधून ...

हिंगोली जिल्ह्यातील एकूण ३२ वाळू घाटांच्या लिलावासाठी निविदा काढली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ घाट लिलावात गेले आहेत. यामधून ५.६० कोटींचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया झाली असतानाच एका ठिकाणचे प्रकरण न्यायालयात गेल्याने राज्यातील सर्वच ठिकाणच्या घाटांच्या पुढील प्रक्रियेवर स्थगिती आली होती. त्यामुळे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून ही स्थगिती उठण्याची प्रतीक्षा केली जात होती. आता ही स्थगिती उठली आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून रक्कम भरून घेतल्यानंतर हे घाट त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. लिलावात गेलेल्या घाटांमध्ये वसमत तालुक्यातील ब्राह्मणगाव खु., परळी दशरथे, माटेगाव, औंढा तालुक्यातील आजरसोंडा, माथा हे कयाधू नदीवरील पाच घाट लिलावात गेले आहेत, तर कळमनुरी तालुक्यातील सापळी व कसबे धावंडा हे कयाधू नदीवरील दोन घाट लिलावात गेले आहेत.

२६ हजार ६४८ ब्रास वाळू उपलब्ध होणार

लिलावात गेलेल्या घाटांमध्ये ब्राह्मणगाव खु., २५५५ ब्रास, माथा २३१०, सापळी १८७३, परळी दशरथे २३५०, आजरसोंडा १७३१, कसबे धावंडा २७९०, माटेगाव २८५९ ब्रास अशी वाळू उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदा बांधकामांना पुन्हा वेग येणार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यात आणखी काही घाट लिलावात गेले तर गगनाला भिडलेले वाळूचे दर निम्म्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही.