शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

हिंगोली : एस. टी. कर्मचाऱ्यांएवढे कोणीच जास्तीचे काम करु शकत नाही. परंतु, त्यांनाच वेळेवर पगार मिळत नाही. ...

हिंगोली : एस. टी. कर्मचाऱ्यांएवढे कोणीच जास्तीचे काम करु शकत नाही. परंतु, त्यांनाच वेळेवर पगार मिळत नाही. ही खेदाची बाब आहे. यापुढे एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दखल घेतली जाईल, असे प्रतिपादन आ. संतोष बांगर यांनी केले.

५ सप्टेंबर रोजी शहरात एस. टी. कामगार सेनेच्या वतीने एस. टी. कामगारांची बैठक घेण्यात आली. आ. बांगर म्हणाले, गत दोन वर्षांपासून कोरोनाने सळो की पळो करुन सोडले आहे. कोणीही बाहेर निघण्यास तयार नाही. परंतु, एस. टी. महामंडळाचे चालक, वाहक व इतर कर्मचारी शासनाच्या आदेशानुसार जीवाची पर्वा न करता मुंबईला जाऊन एस. टी. महामंडळाचे काम करत आहेत. मग अशावेळी कोणीतरी त्यांच्या पाठिशी उभे राहायला पाहिजे. यापुढे एस. टी. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होईल, यासाठी प्रयत्न केले जातील.

याप्रसंगी राम कदम यांची शिवसेनेच्या युवा जिल्हा अध्यक्षपदी निवड तसेच डी. आर. दराडे यांची औरंगाबाद प्रादेशिक सचिवपदी, जळगाव संपर्कप्रमुख निवड झाल्याबद्दल आ. संतोष बांगर यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीला विभागीय उपाध्यक्ष मो. इस्माईल, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊराव कऱ्हाळे, आगार सचिव गजानन सांगळे, आगार अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, गोपाल गिरी, पी. डी. घुगे, सुवर्णा घोटेकर, सीमा पतंगे, मीना आंभोरे, पवार, हागवणे, सीडाम, पूजा वाणी, पुंडगे, कुऱ्हे, कपाटे तसेच हिंगोली, परभणी, कळमनुरी, वसमत आदी विभागातील एस. टी. कर्मचारी उपस्थित होते.