शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

उरलेल्या दुकानांनाही आता दिवसाआड शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

हिंगोली जिल्ह्यात १५ जूनपर्यंत शनिवार व रविवार वगळून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी दोन या वेळेत सुरू ...

हिंगोली जिल्ह्यात १५ जूनपर्यंत शनिवार व रविवार वगळून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील हॉटेल, रेस्टॉरंट आदींना घरपोच सुविधा देण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र या अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी नव्हती. निदान एक दिवसाआड तरी व्यापाराची मुभा देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार केली जात होती. आज अनेक कपडा व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने पेच निर्माण झाला होता. इतरही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. त्यामुळे शहर पोलिसांनी हस्तक्षेप करीत या दुकानदारांना पोलीस ठाण्यात नेले होते. अशांना दंडही आकारण्यात आला.

आता अत्यावश्यक सेवा वगळून इतर अस्थापना, दुकाने २ जूनपासून एक दिवसाआड सकाळी ७ ते २ या कालावधीत उघडता येणार आहेत. ४, ६, ८, १०, १२ व १४ जून रोजी दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेशात एवढाच बदल केला असून पूर्वीच्या आदेशातील इतर बाबी कायम आहेत.

तर दुकानावर कायमची बंदी

ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्तच्या काळात मात्र कोणत्याही अस्थापनांना कोणतीही दुकाने उघडी ठेवता येणार नाहीत. तसे आढळून आल्यास कोरोना साथ असेपर्यंत अशा दुकानांवर बंदी घालण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तसेच याबाबतची तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी करून नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करण्यासही आदेशित केले. यात टाळाटाळ अथवा कारवाईस विरोध केल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशराही दिला आहे.