शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

शालेय पोषण आहाराचा प्रत्यक्ष वाटप अहवाल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:26 IST

हिंगोली जिल्ह्यात पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीतील मुलांना वेगवेगळ्या निकषाने धान्य वाटप करण्यात आले. यात एप्रिल ते ...

हिंगोली जिल्ह्यात पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीतील मुलांना वेगवेगळ्या निकषाने धान्य वाटप करण्यात आले. यात एप्रिल ते जून या काळात ३४ दिवसांसाठी १ ते ५ साठी २६० मे.टन तर ६ ते ८ साठी १६५ मे.टन तांदूळ वाटप झाला. जुलै ते सप्टेंबरदरम्यान ६० दिवसांसाठी १ ते ५ साठी ६५९ मे.टन तर ६ ते ८ साठी ५३६ मे.टन, ऑक्टोबर व नोव्हेंबरदरम्यान ५६ दिवसांसाठी १ ते ५ साठी ५८५ मे.टन तर ६ ते ८ साठी ४९४ मे.टन तांदळाचे वाटप शासकीय गोदामातून करण्यात आले आहे. यात १ ते ५ साठी १ किलो ६५० ग्रॅम प्रतिविद्यार्थी तर ६ ते ८ साठी २ किलो ४७५ ग्रॅम प्रतिविद्यार्थी वाटप करण्यास सांगण्यात आले होते.

शासकीय पुरवठा न होणारी मटकी व मसूर डाळ मात्र पोषण आहार कंत्राटदाराकडून दिली जाते. त्याची देयके सादर झाल्यावर ही आकडेवारी कळते. ही डाळही प्रतिविद्यार्थी ६९० ग्रॅम पहिली ते पाचवी तर ६ ते ८ साठी १.२५ किग्रॅ. वाटपाचे आदेश होते, तर मटकी वाटपासाठीही मानके ठरलेली आहेत.

जि.प.च्या शाळांमधून सहसा याचे वाटप चोखपणे करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, अनेक खाजगी शाळांतून कोरोनाशिवायच्या काळातच या पोषण आहाराचे वाटप होत नाही. आता कोरोनाच्या काळातील माल तर अशा शाळांना बोनस स्वरूपातच मिळाल्याचे दिसत आहे. याबाबत शालेय पोषण आहार निरीक्षकांकडून कायम अक्षम्य दुर्लक्ष होत असते. याबाबत वारंवार सांगूनही अनेक ठिकाणी कोणताच फरक दिसत नाही. मात्र, आता प्रत्यक्ष वाटपाची पालक व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनिशी माहिती मागविल्याने अनेक शाळांची गोची होणार आहे.