शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दहा वाजता सुरू होते नोंदणी; दहा मिनिटांत लसीकरण केंद्र हाऊसफुल्ल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून आजपर्यंत ४,२७६ लसीकरण झालेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखांच्या ...

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून आजपर्यंत ४,२७६ लसीकरण झालेले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १३ लाखांच्या आसपास आहे. यात १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्या ३ लाख ९० हजारांच्या जवळपास असू शकते. या सर्वांना ऑनलाइन नोंदणीही बंधनकारक केली आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १ टक्का झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यात लसीकरणासाठी ३३ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. लसीकरण आणि आरटीपीसीआर एकाच छताखाली येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील कल्याण मंडपम् येथे लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानंतर लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक व युवकांकडून प्रतिसाद मिळत असल्यामुळे शहरात सरजूदेवी विद्यालयात नवीन केंद्रही निर्माण केले. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वेळ दिली आहे. एवढे असतानाही या ठिकाणी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

खरे पाहिले तर ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, अशांनी विनाकारण गर्दी न करता घरी बसणे त्यांच्यासाठी हितावह ठरणार आहे. परंतु, तेही विनाकारण लसीकरण केंद्रांसाठी गर्दी करू लागले आहेत.

१८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे शासनाने सांगितले आहे. त्याप्रमाणेच नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. लसीकरण केंद्रांवर मास्क व सामाजिक अंतर ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची कसरत

जिल्ह्यात ३३ लसीकरण केंद्रे असली तरी अनेक ठिकाणी गर्दी दूर करण्यासाठी गार्डची व्यवस्था नाही. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी काही जण कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळ जातात. त्यामुळे नोंदणी करताना अडथळा निर्माण होत आहे. लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ सायंकाळी पाच वाजेची असली तरी सर्व रिपोर्ट वरिष्ठांना देईपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यास सायंकाळचे सात वाजत आहेत. ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत, अशांनी केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन डेटा एंट्री ऑपरेटर बालाजी मास्के यांनी केले आहे.