शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रामराव वडकुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

शिवाजी जाधव यांनी टोकाई कारखान्याच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. आता टोकाईचे अध्यक्षपद मिळताच त्यांनी पुन्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास ...

शिवाजी जाधव यांनी टोकाई कारखान्याच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. आता टोकाईचे अध्यक्षपद मिळताच त्यांनी पुन्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केल्याने या पदाचा पोरखेळ कधी संपणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

आधीच सत्तेत नसल्याने भाजपची जिल्ह्यातील मंडळी हैराण आहे. त्यामुळेच संघटनेतील पदे असूनही काहींना त्यात काहीच रस नाही. तर काहींना मात्र आगामी निवडणुकांच्या तोंडावर नव्या पदाची आस लागली आहे. त्यामुळे अशी मंडळी पक्षात काही पद मिळते का? याचा शोध घेताना दिसत आहे. तसेही काही दिवसांपासून भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पप्पू चव्हाण यांच्या सत्काराचे कार्यक्रम होत आहेत. मात्र तसे पत्र काढून पक्षाने काही घोषणा केली नाही. जुने जिल्हाध्यक्ष गणेश बांगर यांनाही याबाबत कल्पना नसल्याचे ते सांगतात. त्यामुळे आधीच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, हेच ठरत नसताना व पक्षाला जिल्हाध्यक्षच नसताना झालेला हा बदल भाजपमधील नव्या वादाची ठिणगी पाडणारा ठरण्याचे संकेतही देत होता.

जिल्हाध्यक्षपदाच्याच नवनव्या चर्चांमुळे तर आता भाजपमध्ये आपसी वाद उफाळण्याचीही चिन्हे निर्माण झाली होती. यामध्ये पूर्वी प्रामुख्याने आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, मिलिंद यंबल, फुलाजी शिंदे, शिवदास बोड्डेवार यांची नावे चर्चेत होते. ज्यांनी राजीनामा दिला ते शिवाजी जाधव यांच्यामुळे या चौघांनाही पदाची अपेक्षा निर्माण झाली होती. त्यावरून ते सर्वच जण आपापल्या स्तरावरून प्रयत्नही करताना दिसत होते. त्याचा परिणाम म्हणून मागील काही दिवसांपासून भाजपमधील मंडळीच्या मुंबईच्या वाऱ्या वाढल्या होत्या. आता पुन्हा शिवाजी जाधवच शर्यतीत उतरले होते. शिवाय पक्षाला वेळ देण्याची तयारी दाखवत श्रेष्ठींचे उंबरे झिजवू लागले होते. मात्र भाजप श्रेष्ठींनी रामराव वडकुते यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची टाकून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये या पदासाठी सुरू असलेली कुतरओढ आता थांबणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने पक्षाला जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी चेहरा देणे गरजेचे होते. त्यामुळे माजी आमदार रामराव वडकुते यांच्या रूपाने संयमी चेहरा देऊन भाजपने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे.