शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. कोरोनामुळे चार वेळेस पुढे ...

हिंगोली : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. कोरोनामुळे चार वेळेस पुढे ढकलावी लागलेली एमपीएससीची परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार आहे. मात्र यावेळी रेल्वे व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. शासकीय नोकरी मिळविण्यासाठीही अनेक विद्यार्थी रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र शासकीय नोकरीची जाहिरातही कधीतरी निघत असल्याने अनेकांच्या पदरी निराशाच पडत आहे. एमपीएससीमार्फतही राज्य सेवा पूर्वपरीक्षा घेण्याचे वेळापत्रक २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होेते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिका, महागडे क्लासेस लावून अभ्यास सुरू केला होता. मात्र त्यानंतर कोरोनामुळे तब्बल चार वेळेस परीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अखेर शासनाने २१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता याच दिवशी रेल्वे विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षाही होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने यातील नेमकी कोणती परीक्षा द्यायची, या संभ्रमात विद्यार्थी पडले आहेत. रेल्वेची परीक्षा दिली तर एमपीएससीला मुकावे लागणार आहे आणि एमपीएससीची परीक्षा दिली तर रेल्वेच्या परीक्षेला मुकावे लागणार आहे.

रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाइन

रेल्वे विभागाच्या वतीनेही मागील महिनाभरापासून विविध पदासाठी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने टप्प्याटप्प्याने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत असून मराठवाड्यात नांदेड, औरंगाबाद, लातूर आदी ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले.

परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींची कसरत

एमपीएससी व रेल्वे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांला मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच बसस्थानकाशिवाय इतर ठिकाणी बस थांबविली जात नाही. प्रवासासाठी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

२१ रोजी दोन्ही परीक्षा

एमपीएससीसाठी विद्यार्थी - १५६०

परीक्षा केंद्र - ०६

दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात

राज्य सेवा परीक्षा व रेल्वे परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडला आहे. बरेच दिवस झाले शासकीय नोकर भरती नाही. त्यात शासन असे निर्णय घेत आहे. त्यामुळे आम्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. आता एका परीक्षेपासून वंचित राहणार असून, अभ्यास, मेहनत व

वेळ वाया जाणार आहे. असली परीक्षा पद्धत चुकीची आहे.

- संतोष ठेंगे, कळमनुरी

२१ मार्च रोजी एकाच दिवशी राज्य सेवा पूर्वपरीक्षा आणि रेल्वे भरतीसाठी परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मानसिकतेवरही परिणाम होत असून एका परीक्षेची संधी निघून जात आहे. प्रत्येक पदाची परीक्षा वेगवेगळ्या दिवशी घ्यायला हवी.

- सुभाष मोगले, मासोड

चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. रेल्वे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी फॉर्म भरला. आता एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेतल्या जात असल्याने गोंधळून तर गेलोच आहे. शिवाय एक संधीही हातची जणार आहे.

- अमोल हाके, तिरुपतीनगर, कळमनुरी