शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

तुरीच्या शेंगा गळाल्या बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील तुरीच्या पिकाने शेंगा धरल्या आहेत; पण बदलल्या वातावरणाचा परिणाम या ...

तुरीच्या शेंगा गळाल्या

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील तुरीच्या पिकाने शेंगा धरल्या आहेत; पण बदलल्या वातावरणाचा परिणाम या पिकावर होत आहे. कधी ढगाळ तर कधी ऊन याप्रमाणे होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे तुरीच्या पिकाच्या शेंगा गळून पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या भागातील तुरीचे पीक उधळले गेले होते; पण या संकटातून कसेबसे बाहेर निघल्यानंतर याच पिकाला आता बदलत्या वातावरणाने ग्रासले आहे. अचानक तुरीच्या पिकाच्या शेंगा गळून पडत आहेत. यामुळे गावातील शेतकरी संकटात सापडला आहे. वारंवार तुरीवर येणाऱ्या संकटामुळे या पिकामध्ये मोठा उतार येणार आहे.

नाल्या तुंबल्याने घाणीचे साम्राज्य

घोटा देवी : हिंगोली तालुक्यातील घोटा देवी गावातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे गावात घाण पसरत आहे. बऱ्याच नालीतील पाणी गावातील रस्त्यावर येऊन जमा होत असल्याने गावामध्ये दुर्गंधी पसरत आहे, तसेच रस्त्यावर साचणाऱ्या घाण पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. यासाठी गावातील तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी गावातून होत आहे.

वरूड चक्रपान- भानखेडा रस्ता उखडला

वरूड चक्रपान : सेनगाव तालुक्यातील वरूड चक्रपान येथून भानखेडा गावाकडे जाणारा मुख्य रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरवस्था वर्षभरापासून झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गावांतील नागरिकांची दोन्ही गावांत नेहमी ये-जा सुरूच असते; पण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता दुरवस्थेत सापडला आहे. वरूड चक्रपान - भानखेडा हा पाच कि.मी.चा रस्ता आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थ करीत आहेत.

वन्य प्राण्यांकडून पिकाचे नुकसान

भानखेडा : सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू, हरभरा व ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या या सर्व पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे; पण या शेतशिवारात रात्री व सकाळच्या सुमारास रानडुक्कर, रोही, हरिण तसेच वानर घुसून पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. मागील १५ दिवसांपासून या वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान करण्याचे सत्र सुरू केले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे राखण करताना रात्री शेतात जागरण करावे लागत आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

बससेवा सुरू करण्याची मागणी

पांगरा शिंदे : मागील २० वर्षांपासून सुरू असलेली कळमनुरी येथील डेपोतील गावात येणारी बससेवा अचानक बंद झाल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गावासह परिसरातील राजवाडी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा, कुपटी, वापटी, बोल्डा, येहळेगाव तु., वाई यासह इतर काही गावांतील लोक नेहमी बाळापूर व कळमनुरी याठिकाणी जात असतात. त्यामुळे याठिकाणी कळमनुरी येथून सुरू असलेल्या बससेवेचा मोठा फायदा या गावकऱ्यांना होत असे. विशेष म्हणजे परिसरातील गावांतील प्रवासीवर्गही या बससाठी मोठ्या प्रमाणात असल्याने या बसला आर्थिक फायदाही होत होता; पण ही बससेवा बंद झाल्याने गावातील वयोवृद्धांसह इतर प्रवासीवर्गाला खाजगी वाहनातून जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.