शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:24 IST

तुरीच्या शेंगा गळाल्या बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील तुरीच्या पिकाने शेंगा धरल्या आहेत; पण बदलल्या वातावरणाचा परिणाम या ...

तुरीच्या शेंगा गळाल्या

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील तुरीच्या पिकाने शेंगा धरल्या आहेत; पण बदलल्या वातावरणाचा परिणाम या पिकावर होत आहे. कधी ढगाळ तर कधी ऊन याप्रमाणे होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे तुरीच्या पिकाच्या शेंगा गळून पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या भागातील तुरीचे पीक उधळले गेले होते; पण या संकटातून कसेबसे बाहेर निघल्यानंतर याच पिकाला आता बदलत्या वातावरणाने ग्रासले आहे. अचानक तुरीच्या पिकाच्या शेंगा गळून पडत आहेत. यामुळे गावातील शेतकरी संकटात सापडला आहे. वारंवार तुरीवर येणाऱ्या संकटामुळे या पिकामध्ये मोठा उतार येणार आहे.

नाल्या तुंबल्याने घाणीचे साम्राज्य

घोटा देवी : हिंगोली तालुक्यातील घोटा देवी गावातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे गावात घाण पसरत आहे. बऱ्याच नालीतील पाणी गावातील रस्त्यावर येऊन जमा होत असल्याने गावामध्ये दुर्गंधी पसरत आहे, तसेच रस्त्यावर साचणाऱ्या घाण पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. यासाठी गावातील तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी गावातून होत आहे.

वरूड चक्रपान- भानखेडा रस्ता उखडला

वरूड चक्रपान : सेनगाव तालुक्यातील वरूड चक्रपान येथून भानखेडा गावाकडे जाणारा मुख्य रस्ता उखडला आहे. या रस्त्याची दुरवस्था वर्षभरापासून झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गावांतील नागरिकांची दोन्ही गावांत नेहमी ये-जा सुरूच असते; पण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता दुरवस्थेत सापडला आहे. वरूड चक्रपान - भानखेडा हा पाच कि.मी.चा रस्ता आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थ करीत आहेत.

वन्य प्राण्यांकडून पिकाचे नुकसान

भानखेडा : सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू, हरभरा व ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. सध्या या सर्व पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात झाली आहे; पण या शेतशिवारात रात्री व सकाळच्या सुमारास रानडुक्कर, रोही, हरिण तसेच वानर घुसून पिकांचे मोठे नुकसान करीत आहे. मागील १५ दिवसांपासून या वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान करण्याचे सत्र सुरू केले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे राखण करताना रात्री शेतात जागरण करावे लागत आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

बससेवा सुरू करण्याची मागणी

पांगरा शिंदे : मागील २० वर्षांपासून सुरू असलेली कळमनुरी येथील डेपोतील गावात येणारी बससेवा अचानक बंद झाल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गावासह परिसरातील राजवाडी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा, कुपटी, वापटी, बोल्डा, येहळेगाव तु., वाई यासह इतर काही गावांतील लोक नेहमी बाळापूर व कळमनुरी याठिकाणी जात असतात. त्यामुळे याठिकाणी कळमनुरी येथून सुरू असलेल्या बससेवेचा मोठा फायदा या गावकऱ्यांना होत असे. विशेष म्हणजे परिसरातील गावांतील प्रवासीवर्गही या बससाठी मोठ्या प्रमाणात असल्याने या बसला आर्थिक फायदाही होत होता; पण ही बससेवा बंद झाल्याने गावातील वयोवृद्धांसह इतर प्रवासीवर्गाला खाजगी वाहनातून जास्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.