शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

पितृपंधरवड्यात कद्दू खातोय भाव; भाजी मंडईत १० तर घराजवळ २० रुपये नग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

हिंगोली : सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे गवार, काकडी, कद्दू, फुलकोबी, पानकोबी या भाज्यांची मागणी वाढली असल्याचे दिसून येत ...

हिंगोली : सध्या सुरू असलेल्या पितृपंधरवड्यामुळे गवार, काकडी, कद्दू, फुलकोबी, पानकोबी या भाज्यांची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. भाजी मंडईत कद्दू १० रुपये, तर घराजवळ कद्दूला भाव मात्र वाढलेला पहायला मिळत आहे. २० रुपयाला एक नग या प्रमाणे कद्दू खरेदी करावा लागत आहे.

दोन महिन्यांपासून भाज्यांची आवकही चांगली आहे; परंतु काही व्यापारी मात्र चढ्या दराने भाजीपाला विकत असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील डिग्रस, औंढा, दाटेगाव, लोहगाव, भांडेगाव, साटंबा, सवड, पुसेगाव आदी ठिकाणांहून शहरातील मंडईमध्ये भाजीपाला येतो. सध्या पितृपंधरवडा असल्यामुळे जेवणामध्ये भाज्यांचा मान असतो. मंडईत जो भाव आहे तो भाव घराजवळ मिळत नाही. गाडीवाले जो भाव सांगतील त्या भावानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

छोटे विक्रेते काय म्हणतात...

महागाईने कळस गाठल्यामुळे शेतकऱ्यांकडून भाज्या घेणे परवडेना झाले आहे. भाज्यांची आवक सध्या चांगली असली तरी काही भाज्यांसाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.

-बाळासाहेब देशमुख, भाजी विक्रेता

पितृपंधरवडा सुरू झाल्यामुळे काही भाज्या महागल्या आहेत. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ५ रुपये भावानेच ते मंडईत विकले जात आहेत. महागाईमुळे हा व्यवसाय करणेही अवघड होऊन बसले आहे.

-शेख फेरोज, भाजी विक्रेता

मागणी वाढली... पितृपंधरवडा सुरू झाल्यामुळे गवार, भेंडी, टोमॅटो, फुलकोबी, पानकोबी, हिरवी मिरची, शेवगा, दोडका आदी भाज्यांना मागणी वाढली आहे. कोथिंबीर तर १०० ते १२५ रुपये किलोने मंडईत विकली जात आहे. शेवगा तर ७० रुपये किलोने विक्री होत आहे.

अर्धा किलोसाठी बाजारात कोण जाणार? अर्धा किलोसाठी मंडईत जाणे शक्य नसल्यामुळे घराजवळ आलेल्या गाड्यावरून भाजी घ्यावी म्हटले तर विक्रेते जास्तीचा भाव सांगतात. अशावेळी मंडईत जाऊन भाजी आणलेली बरे असे कधी-कधी वाटते.

- सुरेखा कल्याणकर, गृहिणी.

- भाजी मंडई दूर असल्यामुळे घराजवळ आलेल्या भाजी विक्रेत्याकडून भाजी घेणे सध्या परवडेना झाले आहे. नाईलाजाने भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागत आहे.

- मनीषा शिंदे, गृहिणी.