शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परभणीत कडकडीत बंद

By admin | Updated: November 11, 2014 15:43 IST

नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणी: नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने बाजारपेठ व रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. दुपारी शनिवार बाजार येथून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात जिल्हाभरातून नागरिक सहभागी झाले होते.पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे २१ ऑक्टोबर रोजी जाधव कुटुंबियातील तिघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेने फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासली गेली. घटनेला २0 दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी संघटनांच्या वतीने १0 नोव्हेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला विविध पक्ष,संघटना व विविधस्तरातून जाहीर पाठिंबा देण्यात आला होता. बंदच्या आवाहनानुसार सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. शहरातील कच्छी बाजार, गुजरीबाजार, जनता मार्केट, शिवाजीचौक, नानलपेठ, गांधी पार्क हा भाग मुख्य बाजारपेठेचा आहे. या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. परंतु, सोमवारी मात्र दिवसभर या भागातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे, शहराला लागून असलेल्या वसाहती आणि परिसरातील दुकानेदेखील कडकडीत बंद ठेवण्यात आली. बंदमुळे शहरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ दिसून आली. सायंकाळी ४वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात आला. सायंकाळी ४ वाजेनंतर शहरातील व्यवहार सुरु झाल्याचे पहावयास मिळाले. बंद काळामध्ये शहरातील काही प्रतिष्ठानांवर दगड फेकून काच फोडल्याचा प्रकार वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही