शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

विजेचा लपंडाव; ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

गतिरोधक बनले धोकादायक हिंगोली : औंढा रोडवरील कयाधू नदी जवळील गतिरोधक धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार गतिरोधकाच्या बाजूने जात आहेत. ...

गतिरोधक बनले धोकादायक

हिंगोली : औंढा रोडवरील कयाधू नदी जवळील गतिरोधक धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार गतिरोधकाच्या बाजूने जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोठे वाहनांनाही हे गतिरोधक त्रासदायक असेच बनले आहे. संबंधितांनी लक्ष देऊन गतिरोधक नव्याने करावे, अशी मागणी होत आहे.

‘फुल पिकांना पाणी वेळेवर द्यावे’

हिंगोली : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन फूल उत्पादकांनी फुल पिकांना पाणी वेळेवर द्यावे. जेणेकरून फुले वाळणार नाहीत. विशेष म्हणजे मोगरा फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

चारा झाकून ठेवण्याचे आवाहन

हिंगोली : गत पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पशु पालकांनी जनावरांचा चारा हा सावलीच्या ठिकाणी नेऊन ठेवावा. चारा जास्त प्रमाणात वाळल्यास जनावरे चारा खात नाहीत. चाऱ्याबरोबर जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वाडी-तांड्यांवर पाणीटंचाई

कळमनुरी : ग्रामीण भागातील वाडी-तांड्यांवर मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत. जे काही चालू आहेत त्या ठिकाणी रांगा लागत आहेत. प्रशासनाने वाडी-तांड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सरकारी दवाखान्यासमोर खड्डे

हिंगोली : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे पडल्यामुळे रुग्णांना, तसेच नातेवाइकांना त्रास होत आहे. वेळोवेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाला सांगण्यात आले. परंतु, अद्याप तरी प्रशासनाने लक्ष दिले नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

‘भाजीपाला सुकणार नाही याची काळजी घ्यावी’

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. विहिरीची पाणीपातळीही खोल गेली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी पाण्यावाचून भाजीपाला सुकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

नाल्या साफ नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले

आखाडा बाळापूर : गावातील अनेक वॉर्डांतील नाल्या साफ केल्या नाहीत. त्यामुळे जागोजागी डासांचे प्रमाण वाढले आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे गावात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.