शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

विजेचा लपंडाव; ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST

गतिरोधक बनले धोकादायक हिंगोली : औंढा रोडवरील कयाधू नदी जवळील गतिरोधक धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार गतिरोधकाच्या बाजूने जात आहेत. ...

गतिरोधक बनले धोकादायक

हिंगोली : औंढा रोडवरील कयाधू नदी जवळील गतिरोधक धोकादायक बनले आहे. दुचाकीस्वार गतिरोधकाच्या बाजूने जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोठे वाहनांनाही हे गतिरोधक त्रासदायक असेच बनले आहे. संबंधितांनी लक्ष देऊन गतिरोधक नव्याने करावे, अशी मागणी होत आहे.

‘फुल पिकांना पाणी वेळेवर द्यावे’

हिंगोली : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन फूल उत्पादकांनी फुल पिकांना पाणी वेळेवर द्यावे. जेणेकरून फुले वाळणार नाहीत. विशेष म्हणजे मोगरा फुलांची तोडणी सकाळी लवकर करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

चारा झाकून ठेवण्याचे आवाहन

हिंगोली : गत पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पशु पालकांनी जनावरांचा चारा हा सावलीच्या ठिकाणी नेऊन ठेवावा. चारा जास्त प्रमाणात वाळल्यास जनावरे चारा खात नाहीत. चाऱ्याबरोबर जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वाडी-तांड्यांवर पाणीटंचाई

कळमनुरी : ग्रामीण भागातील वाडी-तांड्यांवर मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत. जे काही चालू आहेत त्या ठिकाणी रांगा लागत आहेत. प्रशासनाने वाडी-तांड्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सरकारी दवाखान्यासमोर खड्डे

हिंगोली : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे पडल्यामुळे रुग्णांना, तसेच नातेवाइकांना त्रास होत आहे. वेळोवेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाला सांगण्यात आले. परंतु, अद्याप तरी प्रशासनाने लक्ष दिले नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

‘भाजीपाला सुकणार नाही याची काळजी घ्यावी’

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. विहिरीची पाणीपातळीही खोल गेली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी पाण्यावाचून भाजीपाला सुकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

नाल्या साफ नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले

आखाडा बाळापूर : गावातील अनेक वॉर्डांतील नाल्या साफ केल्या नाहीत. त्यामुळे जागोजागी डासांचे प्रमाण वाढले आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे गावात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.