शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त कळमनुरी: राज्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून वाहनचालकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. ...

रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त

कळमनुरी: राज्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून वाहनचालकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे, अशा वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

हातगाडे परत रस्त्यावरच

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर आदी भागामध्ये वारंवार सूचना देऊनही हातगाडे रस्त्यावरच गाडे उभे करुन फळांची विक्री करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अतोनात त्रास होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन हातगाडे चालकांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी होत आहे.

शहरातील अंतर्गत रस्ते उखडले

हिंगोली: शहरातील इंदिरानगर, नाईकनगर, गंगानगर, पेन्शनपुरा आदी नगरातील रस्ते उखडले आहेत. काही ठिकाणी नाल्या नसल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या संंबंधित विभागाने लक्ष देऊन या भागातील रस्ते दुरुस्त करुन नाल्या बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात विजेचा लपंडाव हा नित्याचाच झाला आहे. यावर्षी पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली उगवली आहेत. विहिरी, तलावांनाही पाणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु मागील दहा-पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

धुळीमुळे प्रवाशांना होतोय त्रास

हिंगोली: मागील काही महिन्यांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. नवीन बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागाही नाही. धुळीतच प्रवाशांना बसेसची वाट पहावी लागत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.