शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

वळणरस्त्यावर खड्डे ; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

हिंगोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था हिंगोली: शहरातील अंतुलेनगर बळसोंड, खटकाळी बायपास, आनंदनगर आदी भागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले ...

हिंगोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

हिंगोली: शहरातील अंतुलेनगर बळसोंड, खटकाळी बायपास, आनंदनगर आदी भागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करावी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, शाहूनगर भागातील नाल्यांची अनेक दिवसांपासून साफसफाई करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. नगरपरिेषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागातील नाल्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील नांदेड नाका, बसस्थानक परिसर आदी भागांतील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या भागातील नागरिकांना तसेच बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागातील काही पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत. नगरपरिषदेने पथदिवे सुरू करावेत.

बसस्थानकात खड्डेच-खड्डे

हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून खड्डेच-खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे. याचबरोबर धुळीचे प्रमाणही वाढले आहे. धुळीमध्ये प्रवाशांना बसावे लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेड नाका आदी भागांमध्ये नियमांचे उल्लंघन केेले जात आहे. यामुळे अपघात घडत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

नांदेड नाका ते खटकाळी रस्ता खड्डेमय

हिंगोली: नांदेड नाका ते खटकाळी हा रस्ता मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक कमालीचे वैतागले आहेत. या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग काढून दिला आहे. परंतु, तोही पूर्णत: उखडला आहे.

शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरात मागील काही दिवसांपासून तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने दखल घेऊन पिकांवर पडत असलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.