शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

वळणरस्त्यावर खड्डे ; वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST

हिंगोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था हिंगोली: शहरातील अंतुलेनगर बळसोंड, खटकाळी बायपास, आनंदनगर आदी भागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले ...

हिंगोली शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

हिंगोली: शहरातील अंतुलेनगर बळसोंड, खटकाळी बायपास, आनंदनगर आदी भागांतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेने याची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे.

नाल्यांवर औषध फवारणी करावी

हिंगोली: शहरातील जिजामातानगर, शाहूनगर भागातील नाल्यांची अनेक दिवसांपासून साफसफाई करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. नगरपरिेषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन या भागातील नाल्यावर औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील नांदेड नाका, बसस्थानक परिसर आदी भागांतील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या भागातील नागरिकांना तसेच बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागातील काही पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत. नगरपरिषदेने पथदिवे सुरू करावेत.

बसस्थानकात खड्डेच-खड्डे

हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून खड्डेच-खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत आहे. याचबरोबर धुळीचे प्रमाणही वाढले आहे. धुळीमध्ये प्रवाशांना बसावे लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेड नाका आदी भागांमध्ये नियमांचे उल्लंघन केेले जात आहे. यामुळे अपघात घडत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

नांदेड नाका ते खटकाळी रस्ता खड्डेमय

हिंगोली: नांदेड नाका ते खटकाळी हा रस्ता मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात उखडला आहे. त्यामुळे वाहनचालक कमालीचे वैतागले आहेत. या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्ग काढून दिला आहे. परंतु, तोही पूर्णत: उखडला आहे.

शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे

पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरात मागील काही दिवसांपासून तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने दखल घेऊन पिकांवर पडत असलेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.