शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध न पाळणाऱ्या बेबंदांमुळे पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी करताना जीवनावश्यक बाबींना मात्र शिथिलता दिली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेऊन गर्दी केली ...

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी करताना जीवनावश्यक बाबींना मात्र शिथिलता दिली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेऊन गर्दी केली जात असून, बाजारपेठेत धुडगूस घातला जात आहे. अनेक दुकानेही निर्बंध असतानाही मागच्या दरवाजाने अथवा अर्धे शटर करून सुरू ठेवण्याचे धाडस केले जात आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेत नाही. मागील तीन महिन्यांचाच विचार केला तर टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता १५ टक्क्यांच्याही पुढे सरकलेला आहे. त्यात कमी - अधिक चाचण्या होत असल्या तरीही या दरात फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब घातक असून, शंभरात पंधरा बाधित निघत असतील व त्यांनी जराही काळजी न घेतल्यास हा दर असाच वाढत गेला तर बाहेर पडणेही मुश्कील होणार आहे. आधीच यंत्रणा अपुरी पडत असून, नव्याने यंत्रणा उभारण्यासह आहे ती यंत्रणा कार्यान्वित ठेवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन, कोरोना प्रतिबंधक लस या सर्वच बाबींचाही तुटवडा आहे.

फेब्रुवारीत पाच टक्के होता दर

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांवर होता. या महिन्यात आरटीपीसीआरच्या ५८४८ चाचण्या, तर अँटिजेनच्या १४१५ चाचण्या केल्या होत्या. एकूण ७२६३ पैकी ३६९ बाधित आढळले होते. पॉझिटिव्हिटी दर ५.०८ टक्के होता, तर ४ मृत्यू झाल्याने मृत्यूदर १.०८ होता.

मार्चमध्ये ८.२२ टक्क्यांवर

मार्च महिन्यात आरटीपीसीआरच्या १२७१५, तर अँटिजेन १५०९२ चाचण्या झाल्या. एकूण २९८०७ पैकी २४५२ बाधित आढळले. त्यामुळे पॉझिटिव्हिटी दर ८.२२ टक्के होता, तर या काळात ३० जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युदर १.२२ टक्क्यांवर होता.

एप्रिलमध्ये चित्रच पालटले

एप्रिल महिन्यात कोरोनाचे चित्र एकदमच पालटले. १० एप्रिलपर्यंत आरटीपीसीआरच्या अवघ्या ४९७३, तर अँटिजेनच्या ५४४२ अशा १०४१५ चाचण्या झाल्या. यापैकी तब्बल १७२७ जण बाधित आढळले. पॉझिटिव्हिटी दर १६.५८ टक्के आहे, तर मृत्यू २४ झाले. मृत्युदर १.३९ टक्के आहे. मागील आठ दिवसांतही १५२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट अजूनही त्याच तुलनेत कायम असून, १५ टक्क्यांच्या पुढेच आहे, तर मृत्युदर वाढत चालला आहे.

तब्बल ५४ मृत्यू

चालू महिन्यात तब्बल ५४ मृत्यू झाले आहेत. कोरोनाची साथ आल्यापासून मार्चपर्यंत ९० मृत्यू झाले होते. त्याच्या ६० टक्के मृत्यू फक्त मागील अठरा दिवसांत झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला शासनाचे नियम तोडण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरुणाईला तेवढा फटका बसत नसल्याचे सांगितले जात असले तरीही मागील पंधरा दिवसांत सात ते आठ तरुणांचाही मृत्यू झाला, हे लक्षात घेतले पाहिजे.