शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध न पाळणाऱ्या बेबंदांमुळे पॉझिटिव्हिटी रेट १७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी करताना जीवनावश्यक बाबींना मात्र शिथिलता दिली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेऊन गर्दी केली ...

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी करताना जीवनावश्यक बाबींना मात्र शिथिलता दिली आहे. नेमका याचाच गैरफायदा घेऊन गर्दी केली जात असून, बाजारपेठेत धुडगूस घातला जात आहे. अनेक दुकानेही निर्बंध असतानाही मागच्या दरवाजाने अथवा अर्धे शटर करून सुरू ठेवण्याचे धाडस केले जात आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेत नाही. मागील तीन महिन्यांचाच विचार केला तर टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता १५ टक्क्यांच्याही पुढे सरकलेला आहे. त्यात कमी - अधिक चाचण्या होत असल्या तरीही या दरात फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब घातक असून, शंभरात पंधरा बाधित निघत असतील व त्यांनी जराही काळजी न घेतल्यास हा दर असाच वाढत गेला तर बाहेर पडणेही मुश्कील होणार आहे. आधीच यंत्रणा अपुरी पडत असून, नव्याने यंत्रणा उभारण्यासह आहे ती यंत्रणा कार्यान्वित ठेवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन, कोरोना प्रतिबंधक लस या सर्वच बाबींचाही तुटवडा आहे.

फेब्रुवारीत पाच टक्के होता दर

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांवर होता. या महिन्यात आरटीपीसीआरच्या ५८४८ चाचण्या, तर अँटिजेनच्या १४१५ चाचण्या केल्या होत्या. एकूण ७२६३ पैकी ३६९ बाधित आढळले होते. पॉझिटिव्हिटी दर ५.०८ टक्के होता, तर ४ मृत्यू झाल्याने मृत्यूदर १.०८ होता.

मार्चमध्ये ८.२२ टक्क्यांवर

मार्च महिन्यात आरटीपीसीआरच्या १२७१५, तर अँटिजेन १५०९२ चाचण्या झाल्या. एकूण २९८०७ पैकी २४५२ बाधित आढळले. त्यामुळे पॉझिटिव्हिटी दर ८.२२ टक्के होता, तर या काळात ३० जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युदर १.२२ टक्क्यांवर होता.

एप्रिलमध्ये चित्रच पालटले

एप्रिल महिन्यात कोरोनाचे चित्र एकदमच पालटले. १० एप्रिलपर्यंत आरटीपीसीआरच्या अवघ्या ४९७३, तर अँटिजेनच्या ५४४२ अशा १०४१५ चाचण्या झाल्या. यापैकी तब्बल १७२७ जण बाधित आढळले. पॉझिटिव्हिटी दर १६.५८ टक्के आहे, तर मृत्यू २४ झाले. मृत्युदर १.३९ टक्के आहे. मागील आठ दिवसांतही १५२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट अजूनही त्याच तुलनेत कायम असून, १५ टक्क्यांच्या पुढेच आहे, तर मृत्युदर वाढत चालला आहे.

तब्बल ५४ मृत्यू

चालू महिन्यात तब्बल ५४ मृत्यू झाले आहेत. कोरोनाची साथ आल्यापासून मार्चपर्यंत ९० मृत्यू झाले होते. त्याच्या ६० टक्के मृत्यू फक्त मागील अठरा दिवसांत झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला शासनाचे नियम तोडण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरुणाईला तेवढा फटका बसत नसल्याचे सांगितले जात असले तरीही मागील पंधरा दिवसांत सात ते आठ तरुणांचाही मृत्यू झाला, हे लक्षात घेतले पाहिजे.