शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग

By admin | Updated: October 23, 2014 14:30 IST

कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.

हिंगोली : तहसील कार्यालयाच्या वतीने खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशापेक्षा जास्त असल्याचे ३0 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यता आले होते. कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध गावांत पीककापणी प्रयोग होत आहे. 
प्रयोगासाठी गावांची विभागणी करून सर्वसाधारण ५ गावांच्या गटाकरीता एका पैसेवारी समितीच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचे शेतावर प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीअंती उत्तम, मध्यम व कनिष्ठ जमिनीतील पिकांची निवड करून प्रत्येकी चार असे प्रत्येक पिकाचे एकूण बारा पीक कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. नुकताच या प्रयोगाला तालुक्यात सुरूवात करण्यात आली आहे. निवडलेला प्रत्येक प्लॉट हा १0 बाय १0 मीटरचा टाकून त्यातील पिकाची कापणी, मळणी व उधळणी करून पिकांचे वजन करून उत्पन्न काढण्यात येत आहेत. सदर पीककापणी प्रयोगासाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह सर्व नायब तहसीलदार यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या व पीककापणी प्रयोगाची पाहणी केली. 
सदर पीककापणी प्रयोगामध्ये उत्पादनात घट असल्याचे दिसून आल्याने तालुक्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी वर्तविली आहे. /(प्रतिनिधी) 
■ भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे सोयाबीनच्या उतार्‍यात पावसाच्या दडीमुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नुकसीनीची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दोन वर्षांपासून निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला आहे. मान्सूनच्या सुरूवातीपासून यंदाही पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीन बसला. परिणामी, उतार्‍यात कमालीची घट झाली. पाणी देऊनही एका बॅगला दोन क्विंटलाचा उतार शेतकर्‍यांना आला आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीनुसार सत्य अहवाल तयार करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच प्रकाश कोरडे, उपसरपंच ग्यानदेव कोरडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. (वार्ताहर)