शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग

By admin | Updated: October 23, 2014 14:30 IST

कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.

हिंगोली : तहसील कार्यालयाच्या वतीने खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशापेक्षा जास्त असल्याचे ३0 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यता आले होते. कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध गावांत पीककापणी प्रयोग होत आहे. 
प्रयोगासाठी गावांची विभागणी करून सर्वसाधारण ५ गावांच्या गटाकरीता एका पैसेवारी समितीच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचे शेतावर प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीअंती उत्तम, मध्यम व कनिष्ठ जमिनीतील पिकांची निवड करून प्रत्येकी चार असे प्रत्येक पिकाचे एकूण बारा पीक कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. नुकताच या प्रयोगाला तालुक्यात सुरूवात करण्यात आली आहे. निवडलेला प्रत्येक प्लॉट हा १0 बाय १0 मीटरचा टाकून त्यातील पिकाची कापणी, मळणी व उधळणी करून पिकांचे वजन करून उत्पन्न काढण्यात येत आहेत. सदर पीककापणी प्रयोगासाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह सर्व नायब तहसीलदार यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या व पीककापणी प्रयोगाची पाहणी केली. 
सदर पीककापणी प्रयोगामध्ये उत्पादनात घट असल्याचे दिसून आल्याने तालुक्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी वर्तविली आहे. /(प्रतिनिधी) 
■ भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे सोयाबीनच्या उतार्‍यात पावसाच्या दडीमुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नुकसीनीची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दोन वर्षांपासून निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला आहे. मान्सूनच्या सुरूवातीपासून यंदाही पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीन बसला. परिणामी, उतार्‍यात कमालीची घट झाली. पाणी देऊनही एका बॅगला दोन क्विंटलाचा उतार शेतकर्‍यांना आला आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीनुसार सत्य अहवाल तयार करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच प्रकाश कोरडे, उपसरपंच ग्यानदेव कोरडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. (वार्ताहर)