शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पैसेवारीसाठी पीककापणी प्रयोग

By admin | Updated: October 23, 2014 14:30 IST

कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.

हिंगोली : तहसील कार्यालयाच्या वतीने खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशापेक्षा जास्त असल्याचे ३0 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यता आले होते. कमी पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर पीककापणी प्रयोग मोहीम स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार तालुक्यातील विविध गावांत पीककापणी प्रयोग होत आहे. 
प्रयोगासाठी गावांची विभागणी करून सर्वसाधारण ५ गावांच्या गटाकरीता एका पैसेवारी समितीच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचे शेतावर प्रत्यक्ष फिरून पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीअंती उत्तम, मध्यम व कनिष्ठ जमिनीतील पिकांची निवड करून प्रत्येकी चार असे प्रत्येक पिकाचे एकूण बारा पीक कापणी प्रयोग करण्यात येणार आहेत. नुकताच या प्रयोगाला तालुक्यात सुरूवात करण्यात आली आहे. निवडलेला प्रत्येक प्लॉट हा १0 बाय १0 मीटरचा टाकून त्यातील पिकाची कापणी, मळणी व उधळणी करून पिकांचे वजन करून उत्पन्न काढण्यात येत आहेत. सदर पीककापणी प्रयोगासाठी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह सर्व नायब तहसीलदार यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या व पीककापणी प्रयोगाची पाहणी केली. 
सदर पीककापणी प्रयोगामध्ये उत्पादनात घट असल्याचे दिसून आल्याने तालुक्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी येण्याची शक्यता तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी वर्तविली आहे. /(प्रतिनिधी) 
■ भांडेगाव : हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथे सोयाबीनच्या उतार्‍यात पावसाच्या दडीमुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नुकसीनीची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दोन वर्षांपासून निसर्ग शेतकर्‍यांवर कोपला आहे. मान्सूनच्या सुरूवातीपासून यंदाही पावसाच्या अनियमिततेचा फटका सोयाबीन बसला. परिणामी, उतार्‍यात कमालीची घट झाली. पाणी देऊनही एका बॅगला दोन क्विंटलाचा उतार शेतकर्‍यांना आला आहे. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीनुसार सत्य अहवाल तयार करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच प्रकाश कोरडे, उपसरपंच ग्यानदेव कोरडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. (वार्ताहर)