शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटप अजूनही २९ टक्क्यांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून पीककर्ज वाटपाचा टक्का वाढायला तयार नाही. शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत ...

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून पीककर्ज वाटपाचा टक्का वाढायला तयार नाही. शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. जवळपास ६०० कोटी रुपये यातून बँकांना मिळाले आहेत. कर्जमाफी मिळाल्यानंतरही २५ हजार शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळाले नसल्याचे मागच्या बैठकीतही समोर आले होते. या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्ज देण्याची सूचनाही देण्यात आली होती. मात्र, त्याचा परिणाम बँकांवर झाला नसल्याचे दिसत आहे. सुरुवातीलाच बैठक घेतल्यानंतर बँका सुतासारख्या सरळ होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांची शेतकऱ्यांबाबत असलेली अनास्था वारंवार पुढे येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक कर्जवाटप केले आहे. या बँकेला ११८ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. सध्या २२ हजार १७६ शेतकऱ्यांना ६३.२२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण ५३.१३ टक्के आहे. इतर बँकांप्रमाणेच ही बँकही यंदा मागे पडल्याचे दिसून येत आहे. मात्र, या एकट्या बँकेचे हे पीककर्ज वाटप असल्याने तसा टक्का समाधानकारकच मानायला हरकत नाही. दुसऱ्या क्रमांकाचे पीककर्ज वाटप करणारी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. या बँकेला १२६ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. या बँकेने ५ हजार २८९ शेतकऱ्यांना ४१.१७ कोटींचे कर्जवाटप केले आहे. हे प्रमाण ३२.५९ टक्के आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत व व्यापारी सोळा बँकांनी मिळून फक्त २२.५९ टक्के कर्ज वाटप केले. त्यांना उद्दिष्ट ५१० कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे आहे. प्रत्यक्षात ११ हजार ६३४ शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. त्यामुळे या बँकांची अनास्था समोर येत आहे. यातील अनेक बँकांनी तर शेतकऱ्यांचे प्रस्ताव केवळ सादर करून घेत हेलपाटे मारायला लावले आहे.

कर्जापेक्षा खर्चच जास्त

राष्ट्रीयीकृत बँकांमुळेच शेतकरी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पीकनिहाय कर्जवाटपाचे वेगवेगळे दर आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेत सोसायटीपेक्षा जास्त कर्ज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या बँकांकडे असतो. मात्र, या बँकांत ५० चकरा मारल्यानंतर काम होते अथवा या चकरा वायाही जातात. त्यामुळे एवढा मोठा भुर्दंड सोसणारे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.

लोकप्रतिनिधींसमोर हलवतात माना

राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी जिल्हा प्रशासनासमोर झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींसमोर माना हलवतात. लोकप्रतिनिधीही एसएलबीसीकडे अहवाल पाठविण्याचा धाक दाखवितात. कधी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला जातो. मात्र, यात पुढे काहीच होत नाही. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न, असेच चित्र आहे.