शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

ताप, हिवताप व दमाचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

पाणवट्टे तयार करण्याची मागणी रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात वन विभागाची मोठी जमीन आहे. या वनामध्ये ...

पाणवट्टे तयार करण्याची मागणी

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात वन विभागाची मोठी जमीन आहे. या वनामध्ये निलगाय, रोही, रानडुकर, हरिण, मोर व इतर वन्य जनावरे आहेत. पण सध्या उन्हाळ्याची सुरूवात होत असल्याने या भागातील अनेक पाणीस्त्रोत कोरडे पडत आहे. यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. या वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पानवट्टे उभारण्यात यावे अशी मागणी वनप्रेमींतून होत आहे.

गावातील उकीरडा साफ करावे

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा जि.प. प्रशालेच्या पाठीमागून गावाचा मुख्य रस्ता गेलेला आहे. या रस्त्यावर नागरिकांनी केचकरचा टाकल्याने आता याठिकाणी मोठा उकीरडा निर्माण झाला आहे. यासाठी शाळेच्या पाठीमागे असणारा हा उकीरडा साफ करावा, अशी मागणी गावकऱ्यांसह पालक वर्गातून होत आहे.

उड्डाणपुलाचे काम संथगतीने

हिंगोली : शहरातील खटकाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम मागील दीड वर्षापासून होत आहे. संथगतीने होणाऱ्या या पुलाच्या कामामुळे याठिकाणाहून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्ते उखडलेले असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहे. यासाठी या पूलाचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हरभरा काढणी अंतिम टप्प्यात

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगाव शेतशिवारात हरभरा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील हरभरा पिक काढले असून या पिकात कुठे घट तर कुठे वाढ झाली आहे. या पिकाची काढणी झाल्यानंतर बाजारपेठेत हरभरा पिकास चांगला भाव मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

महावितरणकडून वसुली मोहीम सुरू

हिंगोली : शासनाच्या आदेशानंतर शहरात महावितरण विभागाकडून वीजबिल वसुलीची मोहीम कडक करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांनी वीजदेयके भरावीत म्हणून महावितरणचे कर्मचारी नागरिकांच्या घरोघरी जावून वसुली करीत आहेत. अनेक नागरिकांनी कोरोनामुळे मागील एक वर्षभराचे वीजबिल न भरल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचे वसुलीचे काम वाढले आहे.

पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागेना

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावासह पिंपरखेड गावातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. गावात अंधार राहत असल्यामुळे रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या गावकऱ्यांना ठेसा लागत असल्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच रस्त्यावरील खड्ड्यात पाय जावून गावकरी पडत असल्याचेही दिसत आहे. यामुळे गावातील पथदिवे दुरूस्त व्हावे अशी मागणी होत आहे.

स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज

हिंगोली : शहरातील गांधी चौक, इंदिरा गांधी, इंदिरा खुले नाट्यगृह परिसरात मोठा कचरा जमा झालेला आहे. हा कचरा साफ करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्याची माेहीम राबविण्याची गरज असल्याची चर्चा शहरवासियांतून होत आहे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधही पसरत आहे. यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

अल्पवयीन दुचाकीस्वार वाढले

हिंगोली : शहरात अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असताना दिसून येत आहे. या दुचाकी चालकांचा शहरात आपले वाहन चालवितांना अनेकदा आपला वाहनावरील ताबा सुटत आहे. त्यामुळे शहरात अपघातांच्या संख्या वाढली आहे. या दुचाकीस्वरांमुळे अनेक सुज्ञ नागरिकांच्या वाहनांचा अपघात होत आहे. यामुळे वाहतूक शाखेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.