शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

जिल्ह्यातील २६ लघुतलावांपैकी ११ तलाव शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

हिंगोली: जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २६ तलावांपैकी ११ लघुतलाव शंभर टक्के, तर ७ तलाव ५० टक्के ...

हिंगोली: जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २६ तलावांपैकी ११ लघुतलाव शंभर टक्के, तर ७ तलाव ५० टक्के भरले गेले आहेत.

जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थापक उपविभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पाणी वेळेवर पाणी मिळावे यासाठी लघुतलावांची निर्मिती केली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या पावसामुळे २६ तलावांपैकी ११ तलाव शंभर टक्के भरले आहेत. यामध्ये सेनगाव तालुक्यातील सवना, बाभूळगाव, घोरदरी, वसमत तालुक्यातील राजवाडी, औंढा तालुक्यातील सुरेगाव, पिंपळदरी, औंढा, वाळकी, काकडदाभा, हिंगोली तालुक्यातील सवड, तर कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी तलावाचा समावेश आहे. तर हदगाव, पिंपरी, मरसूल, शेंदूरसना, पुरजळ, केळी हे तलाव ७५ टक्केच्या वर आहेत. यामध्ये हिरडी तलाव अद्यापही जोत्याच्या खाली आहे. पारोळा, वडद, पुरजवळा, वंजारवाडी, दांडेगाव, देवदरी आणि बोथी हे लघुतलाव ५० टक्क्यांच्या खाली आहेत.

असे भरले तलाव...

१०० टक्क्यांच्या वर ११

७५ टक्क्यांच्या वर ६

५० टक्क्यांच्या खाली ८

जोत्याखाली १

जिल्ह्यातील २६ लघुतलावांपैकी ११ तलाव हे तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे शंभर टक्के भरले आहेत. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर केवळ पिकांकरिताच करावा. इतर वेळी पाण्याचा वापर करू नये. जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही.

- व्ही. बी. पत्की, उपविभागीय अधिकारी, सिंचन व्यवस्थापन, उपविभाग क्र. ३

फोटो १०