शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्‍यात ८५ हेक्‍टरवर फळबाग लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

कळमनुरी : या रब्बी हंगामात प्रथमच यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत ...

कळमनुरी : या रब्बी हंगामात प्रथमच यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत तालुक्यात ८५.१० हेक्‍टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सीताफळ, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा ,लिंबू ,पेरू आदी फळबाग पिके ६५ लाभार्थ्यांनी ५० हेक्‍टरवर लावली आहेत. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेंतर्गत सीताफळ, डाळिंब, आंबा, मोसंबी, संत्रा, पेरू, आदी फळबाग पिके ४८ शेतकऱ्यांनी ३५.१० हेक्टरवर लावली आहेत. यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. तालुक्यात रब्बीचे ३६ हजार ६८० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षी ५५ हजार ८४३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे. ही पेरणी १५२.२४ हेक्‍टरवर झालेली आहे. तालुक्‍यात हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र २० हजार ३८३ हेक्‍टर असून, ४० हजार ६५६ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. ही पेरणी १९९.४६ हेक्टरवर झालेली आहे. तालुक्यात गव्हाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ११ हजार ७७४ हेक्टर असून, १३ हजार २१ हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. ही टक्केवारी ११०.५९ टक्के आहे. या हंगामात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रब्बीचा पेरा वाढलेला आहे. गहू व हरभऱ्याचे पेरणीक्षेत्र वाढल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गजानन पवार यांनी दिली.

हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव

मागील आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी या अळीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट होते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. पूर्ण वाढलेल्या रोपांची संख्या सरासरी चौरस मीटर क्षेत्रात दोन-तीन अळ्या आढळल्यास किडीचे नियंत्रण करावे. बदलत्या हवामानामुळे रब्बी व फळबाग पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. हरभरा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर मावा कीडा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. ढगाळ वातावरणामुळे करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करून पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.