शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

बोगस शेतकऱ्यांकडून सहा कोटींपैकी केवळ ५३ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

पीएम किसान योजनेत सुरुवातीपासूनच महसूल विभागाने काम केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यासाठी त्या वेळी मोठा दबाव ...

पीएम किसान योजनेत सुरुवातीपासूनच महसूल विभागाने काम केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यासाठी त्या वेळी मोठा दबाव प्रशासनावर होता. त्यानंतरही एक लाख खातेदार शेतकऱ्यांच्या नोंदी करताना अनेक त्रुटी राहिल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना नावातील तफावत, खाते क्रमांक आदी अनेक बाबींमुळे रक्कम मिळत नव्हती. त्यानंतर शासनाने बाहेरूनच शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची मुभा दिली. यानंतर नोंदणीचा वेग वाढला. मात्र यात अनेक अपात्रांनी शेतकरी म्हणून अर्ज भरत पीएम किसान योजनेत चार महिन्यांनी मिळणारे २ हजारांचे पेन्शन लाटल्याचे समोर आले आहे. या योजनेत आयकर भरणाऱ्या २३९० शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याने त्यांना पात्र ठरविले आहे. यापैकी २३०६ शेतकऱ्यांच्या खात्यावर किमान एक तरी हप्ता जमा झालेला आहे. एकूण १० हजार ८१९ हप्ते या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ही रक्कम २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपये एवढी होते. मात्र यापैकी ४४१ शेतकऱ्यांनी २ हजार ६७ हप्ते परत केले असून ही रक्कम ४१ लाख ३४ हजार एवढी आहे.

अपात्र असतानाही शेतकरी म्हणून नोंदणी केलेल्या ६४९५ जणांना पात्र ठरविले गेले होते. यापैकी ५८८५ जणांच्या खात्यावर किमान एका हप्त्याची तरी रक्कम जमा झाली आहे. एकूण २१ हजार ८४२ हप्त्यांतून ४ कोटी ३६ लाख ८४ हजारांची रक्कम या खात्यांवर जमा झाली आहे. यापैकी केवळ १६० जणांनी ५८८ हप्ते परत केले असून ही रक्कम ११ लाख ७६ हजार एवढी आहे. अपात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असूनही रक्कम परत करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आयकर भरणारे शेतकरी मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून ही रक्कम परत करीत आहेत. यापैकी अनेक जण कर्मचारी किंवा इतर हुद्द्यावरही आहेत. अशांना अडचण नको म्हणून ही रक्कम भरणे क्रमप्राप्त ठरत आहे.

तलाठ्यांचेही काम बंद

राज्यात पीएम किसान योजनेत चांगले काम केल्याचे श्रेय पूर्णपणे कृषी विभागाने लाटल्याचा राग महसूलमधील इतर सर्व घटकांना आला आहे. त्यामुळे ही योजनाच कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे. तसेही तलाठ्यांनी ऑनलाइन काम बंद आंदोलन केले आहे. तलाठी पीएम किसानमधील वसुलीकडे लक्ष देत असल्याने वसुलीचे प्रमाण वाढते होते. आता त्यांनीही वसुली बंद केल्याने आणखी १० ते १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम मार्च एण्डला होईल, असे दिसत नाही. कृषी विभागाकडे हस्तांतरण झाले तर त्यांनाही हे लाभार्थी शोधण्याची कसरत पुन्हा करावी लागणार आहे. आयकर भरणारे सापडतील, मात्र अपात्र लाभार्थी सापडतील का? सापडले तर पैसे भरतील काय? हा प्रश्न आहे. मात्र कृषी व महसूलच्या वादात ही मोठी रक्कम अडकून पडणार असल्याचे दिसत आहे.