शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
4
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
5
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
6
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
7
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
8
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
9
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
10
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
11
Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
12
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
13
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
14
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
15
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
16
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
17
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
18
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
19
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
20
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत केवळ ९ भूखंड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST

हिंगोली येथील एमआयडीसीमध्ये २०४.९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले होते. त्यात २७७ भूखंड विकसित करण्यात आले होते. यापैकी २७६ भूखंड ...

हिंगोली येथील एमआयडीसीमध्ये २०४.९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले होते. त्यात २७७ भूखंड विकसित करण्यात आले होते. यापैकी २७६ भूखंड उद्योग उभारण्यासाठी वितरित करण्यात आले होते. तर सध्या १३६ भूखंडांवर प्रकल्प उभे राहिले आहेत. तसे अर्धे भूखंड अजूनही रिकामेच आहेत; मात्र त्या ठिकाणी प्रकल्प कधी उभे राहणार? हा प्रश्नच आहे; मात्र दुसरीकडे नवीन उद्योजकाने उद्योग उभारणीची मानसिकता केली तर त्याला भूखंडच नसल्याने बाहेर बाजारभावाने भूखंड खेरदी करून उद्योगाकडे वळण्यासाठी भांडवलाचा विचार करावा लागतो. शिवाय इतर सोयी-सुविधांचाही प्रश्न निर्माण होतो. रस्ते, वीज, पाणी आदी बाबींसाठी औद्योगिक वसाहतीत तुलनेत बऱ्यापैकी स्वयंपूर्णत: असते. तसे हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीत पाण्याची समस्या आहे; मात्र निदान वीज व रस्त्यांचा प्रश्न तरी बऱ्यापैकी सुटलेला आहे. पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात तेवढाच सतावतो. त्यावरही काम होणे गरजेचे आहे; मात्र नवीन भूखंडांचा प्रश्न गंभीर असून, अनेक नवे उद्योजक औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. शिवाय ज्यांचे प्रकल्प अजून उभे राहिले नाही, अशांनाही औद्योगिक विकास महामंडळाकडून स्मरण करून देत जागा परत घेण्याची कारवाई होण्याचीही गरज आहे.

वसमतमध्येही १५ हेक्टरवर भूसंपादन झाले होते. यात ४० भूखंड विकसित झाले होते. तालुकास्तरीय औद्योगिक वसाहत असली तरीही ३८ भूखंड हस्तांतरित झाले असून, २७ जणांचे प्रकल्पही उभे राहिले आहेत. या ठिकाणी हे प्रमाण चांगले आहे. दोन भूखंड शिल्लक आहेत. या ठिकाणीही उद्योग उभारणीसाठी नवे उद्योजक पुढे येत असले तरीही जागेचा येथेही प्रश्न आहे. कळमनुरीत ९ हेक्टर जमीन भूसंपादित केली होती. २७ भूखंडांचा विकास करून त्यापैकी २१ उद्योजकांना दिले आहेत. ६ ठिकाणी प्रकल्प उभे राहिले. सुविधांचा अभाव असल्याने या वसाहतीत कोणी फिरकत नसल्याचे दिसत आहे.

इंडस्ट्रियल इस्टेटही फुल्ल, प्रॉडक्शन ठप्प

इंडस्ट्रियल इस्टेट आता शहरात आली. शिवाय येथील अनेक उद्योगही बंद पडले आहेत. या ठिकाणी आता उद्योगांऐवजी व्यापार सुरू झाला आहे. येथे ४.४ हेक्टर जमीन भूसंपादित केली होती. ६४ भूखंड विकसित करून ते उद्योजकांना दिले होते. या ठिकाणी २३ प्रॉडक्शन युनिट सुरू असल्याचे सांगितले जाते; मात्र तेवढेही सुरू असल्याची शंका आहे.

याबाबत उद्योजक नंदकिशोर तोष्णीवाल म्हणाले, ‘‘हिंगोलीत शेतकरी भूसंपादनाला विरोध करीत असल्याचे एमआयडीसीकडून सांगितले जाते; मात्र आता शेतीला चांगला दर दिला जात आहे. एमआयडीसीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. नांदेडला संबंधितांचे कार्यालय असल्याने ते हिंगोलीकडे दुर्लक्ष करतात.’’