शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१४ पैकी ३ बँकांचेच १० टक्क्यांवर पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

हिंगोली : जिल्ह्यातील व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत १४ पैकी ३ बँकांनीच पीककर्ज १० टक्क्यांच्या पुढे वाटप केले आहे. काहींनी तर ...

हिंगोली : जिल्ह्यातील व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत १४ पैकी ३ बँकांनीच पीककर्ज १० टक्क्यांच्या पुढे वाटप केले आहे. काहींनी तर अजून पाच टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. खा. हेमंत पाटील यांनी नुकताच या बँकांना थेट इशारा दिला असला तरीही, आता अनेक बँकांच्या झालेल्या विलीनीकरणाचे विपरित परिणाम दिसण्याची भीती निर्माण झाली आहे.

पूर्वी जिल्ह्यात २० च्या जवळपास व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत बँका होत्या. त्यातील काहींचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे इतरांचे ग्राहक आता या बँकांमध्ये आले आहेत. मात्र अशा बँकांच्या शाखा बंद पडल्यानंतर ज्या बँकेत विलीन झाल्या, तेथील मनुष्यबळ फारसे वाढले नाही. त्यामुळे अनेकांना अजून त्या बँकांचे पूर्ण पीककर्ज ग्राहक सांभाळण्यात अडचणी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे हा नवा प्रश्न उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र एक दिवस दिल्यानंतरही कर्जवाटपाला गती न मिळण्याचे कारण कळायला तयार नाही. एक तर बँका या दिवशीही इतर कामे करीत असाव्यात अथवा बँकांनी दरवर्षीप्रमाणेच यंदाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला गुंगारा देण्याची तयारी चालविली असावी, असे दिसत आहे.

इंडियन बँकेने ४ टक्के, बँक ऑफ बडोदाने ५.५५ टक्के, बँक ऑफ इंडियाने ४.९० टक्के, कॅनरा बँकेने ०.७१ टक्के, पंजाब नॅशनल बँकेने ७.६२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ६.६८ टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाने २.७५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्रने १८ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने १२.८८ टक्के, युको बँकेने १४.३९ टक्के, या दहा बँकांनी ३९८७ शेतकऱ्यांना ३८.६६ कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्ट मात्र ४२४ कोटी वाटपाचे आहे. तसेच ॲक्सिस बँकेने २.६३ टक्के, एचडीएफसीने २.४० टक्के, आयसीआयसीआयने ७.१७ टक्के, आयडीबीआयने ३.८४ टक्के कर्ज वाटप केले. या खासगी बँकांनी २९४ जणांना ४.९० कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्ट ८६ कोटी वाटपाचे आहे.

पाच बँकांच्या विलीनीकरणाचा भार

इंडियन बँकेत अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदामध्ये देना व विजया बँक, कॅनरा बँकेत सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक विलीन झाली. त्यामुळे आता या बँकांचेही पीककर्ज खातेदार या नव्या बँकांना सांभाळावे लागणार आहेत.

मध्यवर्ती बँक टॉपवर

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५ हजार १९८ शेतकऱ्यांना ४२.२५ कोटींचे कर्जवाटप करून ३५ टक्के उद्दिष्ट गाठले, तर ग्रामीण बँकेने यंदा ५९० शेतकऱ्यांना ५.०८ कोटीचे वाटप केले असून ही बँक मागे पडल्याचे दिसत आहे.