शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

१४ पैकी ३ बँकांचेच १० टक्क्यांवर पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

हिंगोली : जिल्ह्यातील व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत १४ पैकी ३ बँकांनीच पीककर्ज १० टक्क्यांच्या पुढे वाटप केले आहे. काहींनी तर ...

हिंगोली : जिल्ह्यातील व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत १४ पैकी ३ बँकांनीच पीककर्ज १० टक्क्यांच्या पुढे वाटप केले आहे. काहींनी तर अजून पाच टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. खा. हेमंत पाटील यांनी नुकताच या बँकांना थेट इशारा दिला असला तरीही, आता अनेक बँकांच्या झालेल्या विलीनीकरणाचे विपरित परिणाम दिसण्याची भीती निर्माण झाली आहे.

पूर्वी जिल्ह्यात २० च्या जवळपास व्यावसायिक व राष्ट्रीयीकृत बँका होत्या. त्यातील काहींचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे इतरांचे ग्राहक आता या बँकांमध्ये आले आहेत. मात्र अशा बँकांच्या शाखा बंद पडल्यानंतर ज्या बँकेत विलीन झाल्या, तेथील मनुष्यबळ फारसे वाढले नाही. त्यामुळे अनेकांना अजून त्या बँकांचे पूर्ण पीककर्ज ग्राहक सांभाळण्यात अडचणी सांगितल्या जात आहेत. त्यामुळे हा नवा प्रश्न उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र एक दिवस दिल्यानंतरही कर्जवाटपाला गती न मिळण्याचे कारण कळायला तयार नाही. एक तर बँका या दिवशीही इतर कामे करीत असाव्यात अथवा बँकांनी दरवर्षीप्रमाणेच यंदाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला गुंगारा देण्याची तयारी चालविली असावी, असे दिसत आहे.

इंडियन बँकेने ४ टक्के, बँक ऑफ बडोदाने ५.५५ टक्के, बँक ऑफ इंडियाने ४.९० टक्के, कॅनरा बँकेने ०.७१ टक्के, पंजाब नॅशनल बँकेने ७.६२ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडियाने ६.६८ टक्के, युनियन बँक ऑफ इंडियाने २.७५ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्रने १८ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने १२.८८ टक्के, युको बँकेने १४.३९ टक्के, या दहा बँकांनी ३९८७ शेतकऱ्यांना ३८.६६ कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्ट मात्र ४२४ कोटी वाटपाचे आहे. तसेच ॲक्सिस बँकेने २.६३ टक्के, एचडीएफसीने २.४० टक्के, आयसीआयसीआयने ७.१७ टक्के, आयडीबीआयने ३.८४ टक्के कर्ज वाटप केले. या खासगी बँकांनी २९४ जणांना ४.९० कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्ट ८६ कोटी वाटपाचे आहे.

पाच बँकांच्या विलीनीकरणाचा भार

इंडियन बँकेत अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदामध्ये देना व विजया बँक, कॅनरा बँकेत सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक विलीन झाली. त्यामुळे आता या बँकांचेही पीककर्ज खातेदार या नव्या बँकांना सांभाळावे लागणार आहेत.

मध्यवर्ती बँक टॉपवर

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने १५ हजार १९८ शेतकऱ्यांना ४२.२५ कोटींचे कर्जवाटप करून ३५ टक्के उद्दिष्ट गाठले, तर ग्रामीण बँकेने यंदा ५९० शेतकऱ्यांना ५.०८ कोटीचे वाटप केले असून ही बँक मागे पडल्याचे दिसत आहे.