शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

२२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये ...

हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये चालक, वाहकाव्यतिरिक्त २२ प्रवासी बसविण्यात येऊन कोरोनाचे नियम पाळले जातील, अशी माहिती हिंगोली आगाराचे स्थानक प्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.

गेल्या दीड वर्षांपासून एस.टी.महामंडळ कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. दीड वर्षात कोट्यवधींचा फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे २५ टक्के कर्मचारीच कामावर बोलावले जात आहेत. ज्यांना कामावर बोलावले नाही, अशांनी बाहेर न फिरता घरीच बसावे, असेही महामंडळाने कर्मचाऱ्यांना कळविले आहे. आजमितीस कोरोना महामारीमुळे डिझेलचा खर्चही निघणे अवघड होऊन बसले आहे. बसेस बाहेर नाही काढल्यास जागेवरच गंज खातात. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न महामंडळाला पडला आहे. आजमितीस तरी महामंडळ आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महामंडळाने बसेस पर जिल्ह्यात सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून महामंडळ २४ मेपासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात यशस्वी झाले आहे. परजिल्ह्यातील प्रवासी भेटल्यासच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारी कमी आहे, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच महामंडळाची बस पाठविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, असे महामंडळाने सांगितले.

आगारातून बस बाहेर काढते वेळेस सॅनिटायझर आणि पाण्याने स्वच्छ करून घेतली जात आहे. यासाठी काही ठराविक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच कर्मचारी आगारातून एसटी बाहेर सोडत आहेत. प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. बसमध्ये चढते वेळेस प्रवाशाला मास्क नसेल तर त्यास खाली उतरविण्यात यावे, अशीही सूचना चालक-वाहकांना देण्यात आली आहे.

शहर बस थांबे केले बंद .....

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बस थांबे बंद करण्यात आले आहेत. चालक-वाहकांनी बस थांब्यावर न थांबविता सरळ बसस्थानकात आणावी. यानंतर बसमधील प्रवाशांची चाचणी करून घरी सोडण्यात यावे, अशीही सूचना चालक, वाहकाला दिली आहे.

पर जिल्ह्यातील प्रवासी मिळाले तरच एस.टी. बसेस बाहेर सोडण्यात येत आहेत. अन्यथा जिल्हांतर्गतच बसेस सुरू आहेत, अशी माहिती कळमनुरीचे आगार प्रमुख अभिजित बोरीकर आणि वसमतचे आगार प्रमुख अनिल निकाळजे यांनी दिली.

उत्पन्न वाढीसाठी सर्वच जण प्रयत्नशील....

गत दीड वर्षापासून एस.टी. महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. अशा परिस्थितीत सर्वच कर्मचारी महामंडळाला प्रवासी कसे मिळतील याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे ड्यूटीवरील कर्मचारी मास्क घालून कामावर येत आहेत. सर्वांनाच कोरोनाचे नियम बंधनकारक केले आहेत.

-डी. आर. दराडे, एसटी कामगार सेना विभागीय सचिव