शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST

हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये ...

हिंगोली: गत २५ एप्रिलपासून बंद असलेली एसटी बससेवा २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता बसमध्ये चालक, वाहकाव्यतिरिक्त २२ प्रवासी बसविण्यात येऊन कोरोनाचे नियम पाळले जातील, अशी माहिती हिंगोली आगाराचे स्थानक प्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी दिली.

गेल्या दीड वर्षांपासून एस.टी.महामंडळ कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. दीड वर्षात कोट्यवधींचा फटका महामंडळाला सहन करावा लागत आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे २५ टक्के कर्मचारीच कामावर बोलावले जात आहेत. ज्यांना कामावर बोलावले नाही, अशांनी बाहेर न फिरता घरीच बसावे, असेही महामंडळाने कर्मचाऱ्यांना कळविले आहे. आजमितीस कोरोना महामारीमुळे डिझेलचा खर्चही निघणे अवघड होऊन बसले आहे. बसेस बाहेर नाही काढल्यास जागेवरच गंज खातात. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न महामंडळाला पडला आहे. आजमितीस तरी महामंडळ आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारीचे प्रमाण जास्त असल्यामुळे महामंडळाने बसेस पर जिल्ह्यात सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून महामंडळ २४ मेपासून जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यात यशस्वी झाले आहे. परजिल्ह्यातील प्रवासी भेटल्यासच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारी कमी आहे, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊनच महामंडळाची बस पाठविली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, असे महामंडळाने सांगितले.

आगारातून बस बाहेर काढते वेळेस सॅनिटायझर आणि पाण्याने स्वच्छ करून घेतली जात आहे. यासाठी काही ठराविक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेच कर्मचारी आगारातून एसटी बाहेर सोडत आहेत. प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. बसमध्ये चढते वेळेस प्रवाशाला मास्क नसेल तर त्यास खाली उतरविण्यात यावे, अशीही सूचना चालक-वाहकांना देण्यात आली आहे.

शहर बस थांबे केले बंद .....

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील बस थांबे बंद करण्यात आले आहेत. चालक-वाहकांनी बस थांब्यावर न थांबविता सरळ बसस्थानकात आणावी. यानंतर बसमधील प्रवाशांची चाचणी करून घरी सोडण्यात यावे, अशीही सूचना चालक, वाहकाला दिली आहे.

पर जिल्ह्यातील प्रवासी मिळाले तरच एस.टी. बसेस बाहेर सोडण्यात येत आहेत. अन्यथा जिल्हांतर्गतच बसेस सुरू आहेत, अशी माहिती कळमनुरीचे आगार प्रमुख अभिजित बोरीकर आणि वसमतचे आगार प्रमुख अनिल निकाळजे यांनी दिली.

उत्पन्न वाढीसाठी सर्वच जण प्रयत्नशील....

गत दीड वर्षापासून एस.टी. महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. अशा परिस्थितीत सर्वच कर्मचारी महामंडळाला प्रवासी कसे मिळतील याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे ड्यूटीवरील कर्मचारी मास्क घालून कामावर येत आहेत. सर्वांनाच कोरोनाचे नियम बंधनकारक केले आहेत.

-डी. आर. दराडे, एसटी कामगार सेना विभागीय सचिव