शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

वृद्ध साहित्यिक, कलावंत निवड समिती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:30 IST

साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणाऱ्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने ...

साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणाऱ्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवडलेल्या कलावंतांच्या बँक खात्यात मानधन जमा केले जाते. या योजनेसाठी पात्र लाभार्थी दरवर्षी तालुकास्तरावर अर्ज सादर करतात. तालुकास्तरावरून हे अर्ज

समाजकल्याण विभागाकडे येतात. प्राप्त अर्जातून पात्र लाभार्थीची निवड जिल्हास्तरीय समिती करते. जिल्ह्यात केंद्र स्तरावरील वृद्ध साहित्यिक, कलावंताची संख्या १ आहे. तर राज्यस्तरावरील ५२ तर जिल्हास्तरावर निवडलेल्या कलावंतांची संख्या ५३० आहे. पात्र कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते. यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होते. मात्र मागील एक ते दीड वर्षापासून जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन झालेली नाही. त्यामुळे नवीन कलावंत निवडीची प्रक्रियाही थंडावली आहे. कोरोनाच्या काळात मानधन मिळेल, अशी अपेक्षा कलावंतांना होती. मात्र जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन नसल्याने वृद्ध कलावंत, साहित्यिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात समाजकल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे यांच्याशी संपर्क साधला असता निवड समिती स्थापन करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कलावंतांना मानधनाचीही प्रतीक्षा

निवड झालेल्या अ गटातील कलावंत, साहित्यिकांना ३१५० रुपयांचे मानधन दर महिन्याला मिळते. तर ब गटातील म्हणजे राज्यस्तरीय कलावंतांना २७०० तर जिल्हास्तरीय क गटातील कलावंत, साहित्यिकांना २२५० रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र मार्च महिन्याचे मानधन रखडल्याची ओरड कलावंतातून होत आहे.