शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वृद्ध साहित्यिक, कलावंत निवड समिती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:30 IST

साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणाऱ्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने ...

साहित्य, कला क्षेत्रात भरीव व दीर्घकाळ कामगिरी करणाऱ्या साहित्यिक व कलावंतांची उतरत्या वयात उपासमार होऊ नये, यासाठी शासनाच्या वतीने मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निवडलेल्या कलावंतांच्या बँक खात्यात मानधन जमा केले जाते. या योजनेसाठी पात्र लाभार्थी दरवर्षी तालुकास्तरावर अर्ज सादर करतात. तालुकास्तरावरून हे अर्ज

समाजकल्याण विभागाकडे येतात. प्राप्त अर्जातून पात्र लाभार्थीची निवड जिल्हास्तरीय समिती करते. जिल्ह्यात केंद्र स्तरावरील वृद्ध साहित्यिक, कलावंताची संख्या १ आहे. तर राज्यस्तरावरील ५२ तर जिल्हास्तरावर निवडलेल्या कलावंतांची संख्या ५३० आहे. पात्र कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते. यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होते. मात्र मागील एक ते दीड वर्षापासून जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन झालेली नाही. त्यामुळे नवीन कलावंत निवडीची प्रक्रियाही थंडावली आहे. कोरोनाच्या काळात मानधन मिळेल, अशी अपेक्षा कलावंतांना होती. मात्र जिल्हास्तरीय निवड समितीच स्थापन नसल्याने वृद्ध कलावंत, साहित्यिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात समाजकल्याण अधिकारी एस.के. मिनगिरे यांच्याशी संपर्क साधला असता निवड समिती स्थापन करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कलावंतांना मानधनाचीही प्रतीक्षा

निवड झालेल्या अ गटातील कलावंत, साहित्यिकांना ३१५० रुपयांचे मानधन दर महिन्याला मिळते. तर ब गटातील म्हणजे राज्यस्तरीय कलावंतांना २७०० तर जिल्हास्तरीय क गटातील कलावंत, साहित्यिकांना २२५० रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र मार्च महिन्याचे मानधन रखडल्याची ओरड कलावंतातून होत आहे.