शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
3
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
4
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
5
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
6
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
7
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
8
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
9
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
10
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
11
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
12
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
13
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
14
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
15
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
16
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
17
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
18
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
19
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
20
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या घटली; मात्र मृत्यूदर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

जिल्ह्यात २८४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी ३४ रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोली परिसरात १३३ पैकी १५ रुग्ण ...

जिल्ह्यात २८४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी ३४ रुग्ण आढळले. यामध्ये हिंगोली परिसरात १३३ पैकी १५ रुग्ण आढळले. यात भटसावंगी १, विवेकानंदनगर १, आदर्श कॉलनी १, फाळेगाव २, नर्सी ३, आदर्श कॉलनी १, बळसोंड १, गाडीपुरा १, बांगरनगर १, कलावतीनगर १, कृष्णानगर १, तर हिंगोलीत एका रुग्णाचा समावेश आहे. वसमत परिसरात ४५ पैकी २ रुग्ण आढळले असून, दोन्ही रुग्ण टेंभुर्णी येथील आहेत. सेनगाव परिसरात ३५ पैकी ६ रुग्ण आढळले. यात जयपूर ३, हत्ता १, पळसी १, उमरदरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. औंढा परिसरात ३८ पैकी ५ रुग्ण आढळले असून, यात अंजनवाडा १, पुरजळ १, वसमत १, जवळा १ व औंढा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात ३३ पैकी ६ जण कोरोनाबाधित निघाले. यात सालापूर १, रेडगाव २, एसएसबी येलकी २, हदगाव १ या रुग्णांचा समावेश आहे.

आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात टालेहॉल गल्ली १, भटकाॅलनी १, जयपूर २, ग्रामीण पोलीस ठाणेजवळ १, देवडानगर १, वसमत १, पळसी येथील एक, असे ९ रुग्ण आढळले. औंढा परिसरात उंडेगाव १ व जवळाबाजार १, असे दोन रुग्ण आढळले.

दरम्यान, सोमवारी १०७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील ५१, लिंबाळा १२, वसमत १२, कळमनुरी १३, औंढा ८, तर सेनगाव येथील ११ बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १४ हजार २२८ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार १२६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ३६० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ३० रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

आतापर्यंत २८५ रुग्णांचा मृत्यू

सोमवारी जिल्ह्यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या वरूड गवळी येथील ६५ वर्षीय पुरुष, मस्तानशाहनगर येथील ४० वर्षीय महिला, रिसोड येथील ७१ वर्षीय पुरुष, अंबिकानगर येथील ६० वर्षीय पुरुष, लासीना येथील ६६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.