शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

तिन्ही आगारांतून सोडली नाही एकही बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे महामंडळाने जिल्ह्यातील तिन्ही आगारांतून एकही ...

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. हे पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे महामंडळाने जिल्ह्यातील तिन्ही आगारांतून एकही बस ग्रामीण भागात किंवा पर जिल्ह्यात सोडली नाही. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व बसेस आगारात लावलेल्या आहेत.

१४ एप्रिलच्या रात्रीपासून १ मेपर्यत राज्य शासनाने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिलपासून २४ एप्रिलपर्यत झिरोफाटा, रिसोड, वाशिम, अकोला, नांदेड या बसेस सुरु होत्या. या दरम्यान, शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रवाशांची तपासणी केली. परंतु, जिल्हा प्रशासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे २५ एप्रिलपासून जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील सर्वच बसेस आता बंद करण्यात आल्या आहेत.एकही बस ग्रामीण भागात किंवा पर जिल्ह्यात पाठविण्यात आली नाही. सर्व बसेस आगारामध्ये लावल्या आहेत. जे कर्मचारी ड्युटीवर आहेत, अशांनीच ड्युटीवर यावे. ज्यांना ड्युटी दिली नाही त्यांनी इतरत्र न फिरता घरीच बसावे, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने एस. टी. महामंडळाला पत्र दिले आहे. महामंडळाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २५ एप्रिल ते १ मेपर्यत तिन्ही आगारांतून बस बाहेर जाता कामा नये. पर जिल्ह्यातून बस आली असेल तर ती बस कोणाच्या परवानगीने जिल्ह्यात आली याची नोंद घ्यावी, असेही नमूद केले आहे.

परजिल्ह्यातील आगारांना केले भ्रमणध्वनी

२४ एप्रिलपर्यत पुसद, वाशिम, रिसोड, नांदेड या आगारांच्या बसेस जिल्ह्यातील तिन्ही आगारांतून ये-जा करत होत्या. या बसेसमधील सर्व प्रवाशांच्या नावासह कंट्रोल कार्यालयात नोंद केली जात होती. परंतु, २४ रोजी जिल्हा प्रशासनाचा नवीन आदेश

धडकताच सर्व आगारांना भ्रमणध्वनी करुन बसेस पर जिल्ह्यात न पाठविण्याची सूचना केली. त्यामुळे २५ एप्रिल रोजी एकही बस पर जिल्ह्यातून आली नाही. तसेच आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. -संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली

फाेटाे नं. १०