शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

कोरोना चाचणीसाठीही कुणी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर ओसरू लागला आहे. अजूनही अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली नाही. मात्र, चाचण्या घटल्याचे दिसून ...

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर ओसरू लागला आहे. अजूनही अपेक्षित प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली नाही. मात्र, चाचण्या घटल्याचे दिसून येत आहे. सध्या नागरिक घराबाहेर पडत नसल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने चाचण्या घटल्या, की नागरिकांनी यासाठी टाळाटाळ चालविली, हे कळायला मार्ग नाही. काही दिवसांपूर्वी शहरात फिरते पथक, जिल्हा रुग्णालय व साठे वाचनालय अशा तीन ठिकाणी चाचण्या होत होत्या. शिवाय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या चाचण्या वेगळ्या असायच्या. आता चाचण्यांची केंद्रही सगळीकडेच कमी झाली आहेत. एखाद्या गावात जास्त रुग्ण आढळले की, तेथेच कॅम्पही लावला जात होता. तोही प्रकार आता बंद झाला आहे. एवढेच काय तर जिल्हा रुग्णालयातील केंद्रही बंद पडले आहे. एकट्या साठे वाचनालयातील केंद्रावरूनच तपासण्या होत आहेत. या ठिकाणी अँटिजन व आरटीपीसीआर दोन्ही प्रकारच्या चाचण्या होत आहेत. मात्र, मध्यंतरी चाचणीची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंतच असल्याने अनेकांना त्यानंतर आल्यावर चाचणीसाठी केंद्र शोधत फिरण्याची वेळ येत होती. आता केंद्र असले तरीही त्याची वेळ तीच कायम असल्याने तीननंतर एखादा रुग्ण आला तर त्याची चाचणी करायला दुसरा दिवसच उजाडतो. त्यातही आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिला तर आणखी एक ते दोन दिवस वाया जातात. अँटिजन चाचणीतच बाधित आढळला, तर निदान उपचार तरी वेळेवर सुरू होतात. या सर्व प्रकारामुळे चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळेच तर रुग्णसंख्या घटली नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. या केंद्राची वेळ वाढविण्याची गरज असून, त्यामुळे कोरोनाचा कहर आणखी कमी करण्यात यश मिळणार आहे.