शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

पर जिल्हांतर्गत रातराणी, परराज्यात कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू ...

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू केल्या आहेत. परंतु, अजून तरी पर राज्यातील रातराणी सुरू केल्या नाहीत. सद्यस्थितीत हैदराबादसाठी दिवसासाठी बस सुरू आहे. प्रवाशांची मागणी आली तर पर राज्यासाठी रातराणी सुरु केली जाईल, असे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी जिल्हांतर्गत लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली आगाराने हिंगोली ते पुणे, हिंगोली ते कोल्हापूर आणि हिंगोली ते सोलापूर या तीन बसेस रातराणी म्हणून सुरू केल्या आहेत. हिंगोली व वसमत आगारातून हैदराबाद या राज्यासाठी दिवसाचा प्रवास करण्यासाठी बस सुरू केली आहे. प्रवाशांनी मागणी केली तर परराज्यातही रातराणी सुरू केली जाईल, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.

सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी...

हिंगोली ते पुणे

हिंगोली ते सोलापूर

हिंगोली ते कोल्हापूर

परराज्यात रातराणीच नाही...

हिंगोली जिल्ह्यातून दिवसासाठी परराज्यात बस आहे. परंतु, रातराणी नाही. त्यामुळे परराज्यातून आलेल्या प्रवाशांना मुक्कामीच रहावे लागते. सकाळ उजाडल्यानंततर परराज्याचा प्रवास करावा लागतो.

सीमेलगतचा संबंध नाही...

हिंगोली सर्व राज्यांच्या मध्यभागी आहे. देगलूर, बिलोली, धुळे, मुक्ताईनगर ही सीमालगत गावे आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांना रातराणी बसेसची आवश्यकता असते. या भागातील आगारांनी रातराणी बसेसची व्यवस्था प्रवाशांसाठी केली आहे. हिंगोली व वसमत येथून पर राज्यासाठी दिवसाची बस सुरु केली आहे. रातराणीची मागणी आल्यास तीही बस सुरू केली जाईल.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख

परराज्यात जाण्यासाठी होतो त्रास...

पर राज्यात जाण्यासाठी रातराणी बस नसल्यामुळे अनेक प्रवाशांंना हिंगोली शहराच्या ठिकाणी मुक्कामी रहावे लागते. एस. टी. महामंडळाने परराज्यासाठी रातराणी बस सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पर राज्यात रातराणी बसने गेल्यास व्यापाराच्या दृष्टीने ते फायद्याचे आहे. सकाळी उठून मोठ्यात शहरात वस्तू खरेदी करता येतात. यानंतर पर राज्यातून परत वापसी मूळगावी येता येते. हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचे आहे. तेव्हा एस. टी. महामंडळाने हिंगोली आगारातून पर राज्यासाठी रातराणी बस सुरू करावी, अशी मागणी व्यापारी व प्रवाशांनी केली आहे.