शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पर जिल्हांतर्गत रातराणी, परराज्यात कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू ...

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू केल्या आहेत. परंतु, अजून तरी पर राज्यातील रातराणी सुरू केल्या नाहीत. सद्यस्थितीत हैदराबादसाठी दिवसासाठी बस सुरू आहे. प्रवाशांची मागणी आली तर पर राज्यासाठी रातराणी सुरु केली जाईल, असे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी जिल्हांतर्गत लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली आगाराने हिंगोली ते पुणे, हिंगोली ते कोल्हापूर आणि हिंगोली ते सोलापूर या तीन बसेस रातराणी म्हणून सुरू केल्या आहेत. हिंगोली व वसमत आगारातून हैदराबाद या राज्यासाठी दिवसाचा प्रवास करण्यासाठी बस सुरू केली आहे. प्रवाशांनी मागणी केली तर परराज्यातही रातराणी सुरू केली जाईल, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.

सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी...

हिंगोली ते पुणे

हिंगोली ते सोलापूर

हिंगोली ते कोल्हापूर

परराज्यात रातराणीच नाही...

हिंगोली जिल्ह्यातून दिवसासाठी परराज्यात बस आहे. परंतु, रातराणी नाही. त्यामुळे परराज्यातून आलेल्या प्रवाशांना मुक्कामीच रहावे लागते. सकाळ उजाडल्यानंततर परराज्याचा प्रवास करावा लागतो.

सीमेलगतचा संबंध नाही...

हिंगोली सर्व राज्यांच्या मध्यभागी आहे. देगलूर, बिलोली, धुळे, मुक्ताईनगर ही सीमालगत गावे आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांना रातराणी बसेसची आवश्यकता असते. या भागातील आगारांनी रातराणी बसेसची व्यवस्था प्रवाशांसाठी केली आहे. हिंगोली व वसमत येथून पर राज्यासाठी दिवसाची बस सुरु केली आहे. रातराणीची मागणी आल्यास तीही बस सुरू केली जाईल.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख

परराज्यात जाण्यासाठी होतो त्रास...

पर राज्यात जाण्यासाठी रातराणी बस नसल्यामुळे अनेक प्रवाशांंना हिंगोली शहराच्या ठिकाणी मुक्कामी रहावे लागते. एस. टी. महामंडळाने परराज्यासाठी रातराणी बस सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पर राज्यात रातराणी बसने गेल्यास व्यापाराच्या दृष्टीने ते फायद्याचे आहे. सकाळी उठून मोठ्यात शहरात वस्तू खरेदी करता येतात. यानंतर पर राज्यातून परत वापसी मूळगावी येता येते. हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचे आहे. तेव्हा एस. टी. महामंडळाने हिंगोली आगारातून पर राज्यासाठी रातराणी बस सुरू करावी, अशी मागणी व्यापारी व प्रवाशांनी केली आहे.