शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

पर जिल्हांतर्गत रातराणी, परराज्यात कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू ...

हिंगोली: कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून शासनाच्या आदेशानुसार लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. तसेच पर जिल्हांतर्गत रातराणीही सुरू केल्या आहेत. परंतु, अजून तरी पर राज्यातील रातराणी सुरू केल्या नाहीत. सद्यस्थितीत हैदराबादसाठी दिवसासाठी बस सुरू आहे. प्रवाशांची मागणी आली तर पर राज्यासाठी रातराणी सुरु केली जाईल, असे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी जिल्हांतर्गत लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली आगाराने हिंगोली ते पुणे, हिंगोली ते कोल्हापूर आणि हिंगोली ते सोलापूर या तीन बसेस रातराणी म्हणून सुरू केल्या आहेत. हिंगोली व वसमत आगारातून हैदराबाद या राज्यासाठी दिवसाचा प्रवास करण्यासाठी बस सुरू केली आहे. प्रवाशांनी मागणी केली तर परराज्यातही रातराणी सुरू केली जाईल, असे एस. टी. महामंडळाने सांगितले.

सध्या सुरू असलेल्या राज्यांतर्गत रातराणी...

हिंगोली ते पुणे

हिंगोली ते सोलापूर

हिंगोली ते कोल्हापूर

परराज्यात रातराणीच नाही...

हिंगोली जिल्ह्यातून दिवसासाठी परराज्यात बस आहे. परंतु, रातराणी नाही. त्यामुळे परराज्यातून आलेल्या प्रवाशांना मुक्कामीच रहावे लागते. सकाळ उजाडल्यानंततर परराज्याचा प्रवास करावा लागतो.

सीमेलगतचा संबंध नाही...

हिंगोली सर्व राज्यांच्या मध्यभागी आहे. देगलूर, बिलोली, धुळे, मुक्ताईनगर ही सीमालगत गावे आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांना रातराणी बसेसची आवश्यकता असते. या भागातील आगारांनी रातराणी बसेसची व्यवस्था प्रवाशांसाठी केली आहे. हिंगोली व वसमत येथून पर राज्यासाठी दिवसाची बस सुरु केली आहे. रातराणीची मागणी आल्यास तीही बस सुरू केली जाईल.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख

परराज्यात जाण्यासाठी होतो त्रास...

पर राज्यात जाण्यासाठी रातराणी बस नसल्यामुळे अनेक प्रवाशांंना हिंगोली शहराच्या ठिकाणी मुक्कामी रहावे लागते. एस. टी. महामंडळाने परराज्यासाठी रातराणी बस सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पर राज्यात रातराणी बसने गेल्यास व्यापाराच्या दृष्टीने ते फायद्याचे आहे. सकाळी उठून मोठ्यात शहरात वस्तू खरेदी करता येतात. यानंतर पर राज्यातून परत वापसी मूळगावी येता येते. हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचे आहे. तेव्हा एस. टी. महामंडळाने हिंगोली आगारातून पर राज्यासाठी रातराणी बस सुरू करावी, अशी मागणी व्यापारी व प्रवाशांनी केली आहे.