कार्यालयीन उपस्थिती पूर्वीप्रमाणेच १५ टक्के अथवा किमान ५ कर्मचारी तर गरजेनुसार १०० टक्के ठेवता येईल. लग्नासाठी केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी आहे. खाजगी प्रवासी वाहतूक केवळ ई पास असल्यास ५० टक्क्यांच्या मर्यादेत, तेही अत्यावश्यक कारणासाठी परवानगी राहील. तर खासगी बसेस वाहतूक मनाई केली. आगारातून ही बस सोडता येणार नाही. इतर आगाराच्या बसेस थेट स्थानकात थांबतील. नोंदणीकृत उद्योग चालू ठेवता येतील. त्यासाठी तहसीलकडून ओळखपत्र घ्यावे लागेल.
बँका व निबंधकांना शिथिलता
बँका व दुय्यम निबंधक कार्यालय ६,८,१०,१२, १४ मे रोजी चालू राहतील. बँकांमध्ये केवळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यवहार करता येतल. इतर वेळेत कार्यालयीन कामकाज करता येईल. दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहारासाठी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.
नियमभंग करणे होईल बंद
जिल्हाधिकाऱ्यांच्या या नव्या आदेशामुळे बाजारपेठेला दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात असलेले निर्बंध झुगारून अनेक दुकानदार बंद शटर आडून ग्राहकी करताना दिसत होते. पालिकेच्या पथकातील लोकही कारवाई करताना थकले. मात्र ही मंडळी नियम मोडण्यास मागेपुढे पाहात नव्हती. आता तरी एक दिवसाआड बाजारपेठ सुरू राहणार असल्याने ही मंडळी नियमभंग करणार नाही, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आता कठोर कारवाई तरी गरजेची आहे.