शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

हिंगोली- केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम ...

हिंगोली- केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम आता आयटीआयमध्ये विलीन केला जाणार आहे. याचा फटका अभ्यासक्रम चालविणारी सहा महाविद्यालये व जवळपास ३५० विद्यार्थ्यांना बसणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारक्षम करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत किमान कौशल्यावर आधारित इयत्ता ११ वी आणि १२ वी स्तरावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील ३२ वर्षापासून शासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित तत्वावर संस्थाद्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो. परंतु, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्रालयाने या योजनेला गुंडाळण्याचा घाट घातला आहे. सदर अभ्यासक्रम बंद करून यातील विद्यार्थी, शिक्षकांना आयटीआयमध्ये विलीनिकरण करण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात एका पथकाने याची चाचपणीही केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

संस्थाचालकांच्या प्रतिक्रीया

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम हा आयटीआयला जोडण्यास हरकत नाही. मात्र आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे. अभ्यासक्रम बंद झाल्यास संस्था, प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

- के.एस. शिंदे, सचिव, बाराशिव शिक्षण संस्था

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद झाल्यास हा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापकांना आयटीआयमध्ये शिल्प निदेशक म्हणून घेतले जाणार आहे. एमएससी कृषी पदवी असणाऱ्या प्राध्यापकांना आयटीआयमध्ये कसे अध्यापन करता येाणर. यात विद्यार्थ्यांचेही नुकसान होईल.

-गजानन असोले, जिल्हाध्यक्ष जुक्टा संघटना.

११ वी , १२ वी ला व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड करणारे विद्यार्थी व्यवसायसह शालेय शिक्षण अनुभवता यावे, यासाठी प्रवेश घेतात. आता आयटीआयमध्ये प्रवेश विलीनीकरण झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

- ज्ञानेश्वर आठवले, विद्यार्थी

प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे. ज्या अभ्यासक्रमात आवड आहे, तो अभ्यासक्रम निवडण्याकडे कल असतो. त्यामुळेच कला, विज्ञान शाखे ऐवजी व्यवसाय अभ्यासक्रम निवडला आहे. आता आयटीआयमध्ये विलीनीकरण झाल्यास नुकसानच होणार आहे.

-मनोज भोजे, विद्यार्थी

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील संस्था

शासकीय - १

अनुदानित- ४

कायम विनाअनुदानित-१

प्रवेश क्षमता -३० (प्रत्येक तुकडी)