शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

हिंगोली- केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम ...

हिंगोली- केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा अभ्यासक्रम आता आयटीआयमध्ये विलीन केला जाणार आहे. याचा फटका अभ्यासक्रम चालविणारी सहा महाविद्यालये व जवळपास ३५० विद्यार्थ्यांना बसणार आहे.

विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारक्षम करण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत किमान कौशल्यावर आधारित इयत्ता ११ वी आणि १२ वी स्तरावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केला आहे. मागील ३२ वर्षापासून शासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित तत्वावर संस्थाद्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो. परंतु, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्रालयाने या योजनेला गुंडाळण्याचा घाट घातला आहे. सदर अभ्यासक्रम बंद करून यातील विद्यार्थी, शिक्षकांना आयटीआयमध्ये विलीनिकरण करण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात एका पथकाने याची चाचपणीही केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा अभ्यासक्रम बंद होणार असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

संस्थाचालकांच्या प्रतिक्रीया

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम हा आयटीआयला जोडण्यास हरकत नाही. मात्र आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे. अभ्यासक्रम बंद झाल्यास संस्था, प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

- के.एस. शिंदे, सचिव, बाराशिव शिक्षण संस्था

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बंद झाल्यास हा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या प्राध्यापकांना आयटीआयमध्ये शिल्प निदेशक म्हणून घेतले जाणार आहे. एमएससी कृषी पदवी असणाऱ्या प्राध्यापकांना आयटीआयमध्ये कसे अध्यापन करता येाणर. यात विद्यार्थ्यांचेही नुकसान होईल.

-गजानन असोले, जिल्हाध्यक्ष जुक्टा संघटना.

११ वी , १२ वी ला व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड करणारे विद्यार्थी व्यवसायसह शालेय शिक्षण अनुभवता यावे, यासाठी प्रवेश घेतात. आता आयटीआयमध्ये प्रवेश विलीनीकरण झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

- ज्ञानेश्वर आठवले, विद्यार्थी

प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे. ज्या अभ्यासक्रमात आवड आहे, तो अभ्यासक्रम निवडण्याकडे कल असतो. त्यामुळेच कला, विज्ञान शाखे ऐवजी व्यवसाय अभ्यासक्रम निवडला आहे. आता आयटीआयमध्ये विलीनीकरण झाल्यास नुकसानच होणार आहे.

-मनोज भोजे, विद्यार्थी

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील संस्था

शासकीय - १

अनुदानित- ४

कायम विनाअनुदानित-१

प्रवेश क्षमता -३० (प्रत्येक तुकडी)