शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

आईची काळजी वाढली ; काळजाच्या तुकड्याला कसे पाठवावे शाळेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न मुलांच्या आईने उपस्थित केला आहे. तसेच तिसऱ्या लाटेची ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न मुलांच्या आईने उपस्थित केला आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने भीतीही वाटत आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून मुलांची शाळा बंदचं आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने शाळा सुरू करण्याचे जाहीर केले. तरी कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवावे वाटत नाही, असा प्रतिप्रश्न मुला-मुलींच्या आईने केला आहे.

कोरोना महामारी ओसरत असली तरी, तिसऱ्या लाटेमुळे मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस काही होत नाही. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या असून काळजावर दगड ठेवून आई मुलांना पाठवत आहेत, व लगेच आणत आहे.

जोपर्यत कोरोना महामारी आहे, तोपर्यत शासनाने मुलांच्या जिवाशी खेळू नये, शाळेत मुलगा गेल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार? असेही मुलांच्या आईने म्हटले आहे. कोरोनामुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवावे वाटत नाही, असेही मुलांच्या आईने म्हटले आहे.

प्रतिक्रिया

शाळा सुरू झाल्या असल्या तरी माझ्या मुलांना शाळेत पाठवावे वाटत नाही. शाळेत पाठविल्यानंतर कोरोना झाला तर कोण जबाबदार राहील? अशावेळी बोलून काहीच मिळत नाही. विशेष म्हणजे शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे.

कौशल्याबाई शिंदे

काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवून घरात मन लागत नाही. कोरोनाने सर्वत्र भयभित वातावरण करून सोडले असताना मुलांना शाळेत पाठविणे योग्यच नाही. मुले-मुली डोळ्यासमोर असतात याचाच जास्त आनंद आईला असतो.

-मनीषा पतंगे

मुलांना शाळेत काय शाळेच्या उंबरठ्यापर्यंतही पाठवावे वाटत नाही. कोरोना कोरोना महामारी काही सांगून येत नाही. त्यामुळे घाई न केलेली बरी असे प्रत्येक मुला-मुलींच्या आईला वाटते. काळजी आहे पण शिक्षणही गरजेचे आहे.

- सुरेखा कल्याणकर

बॉक्स....

जिल्ह्यात आठवीच्या प्राथमिक शाळा ८७९ असून आठवीचा वर्ग असलेल्या शाळा २७२ आहेत. आजमितीस सर्वच शाळा आपल्याला सुरु करायच्या नाहीत. सद्य:स्थितीत आठवीचा वर्ग सुरु करायचा आहे. आजमितीस या संदर्भात ७० प्रस्ताव आले असून २०२ शाळांचे प्रस्ताव येणे बाकी आहे. शासनाची जशी सूचना येईल त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल.

-संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी

ही घ्या काळजी...

शाळेतील मुलांनी तोंडाचा मास्क काढू नये, कोणत्याही वस्तूला हात लावला तरी साबनाने हात धुणे आवश्यक आहे, घरी असो वा शाळेत सॅनिटायझरचा वापर करावा, शाळेत सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, शाळेतून घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावे व स्वच्छपणे साबण लावून आंघोळ करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा ८७९

शाळेसाठी आलेले प्रस्ताव ७०

प्रस्ताव येणे बाकी २०२