शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

आईची काळजी वाढली ; काळजाच्या तुकड्याला कसे पाठवावे शाळेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

हिंगोली : कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न मुलांच्या आईने उपस्थित केला आहे. तसेच तिसऱ्या लाटेची ...

हिंगोली : कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न मुलांच्या आईने उपस्थित केला आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने भीतीही वाटत आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून मुलांची शाळा बंदचं आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने शाळा सुरू करण्याचे जाहीर केले. तरी कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवावे वाटत नाही, असा प्रतिप्रश्न मुला-मुलींच्या आईने केला आहे.

कोरोना महामारी ओसरत असली तरी, तिसऱ्या लाटेमुळे मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस काही होत नाही. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या असून काळजावर दगड ठेवून आई मुलांना पाठवत आहेत, व लगेच आणत आहे.

जोपर्यत कोरोना महामारी आहे, तोपर्यत शासनाने मुलांच्या जिवाशी खेळू नये, शाळेत मुलगा गेल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार? असेही मुलांच्या आईने म्हटले आहे. कोरोनामुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवावे वाटत नाही, असेही मुलांच्या आईने म्हटले आहे.

प्रतिक्रिया

शाळा सुरू झाल्या असल्या तरी माझ्या मुलांना शाळेत पाठवावे वाटत नाही. शाळेत पाठविल्यानंतर कोरोना झाला तर कोण जबाबदार राहील? अशावेळी बोलून काहीच मिळत नाही. विशेष म्हणजे शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे.

कौशल्याबाई शिंदे

काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवून घरात मन लागत नाही. कोरोनाने सर्वत्र भयभित वातावरण करून सोडले असताना मुलांना शाळेत पाठविणे योग्यच नाही. मुले-मुली डोळ्यासमोर असतात याचाच जास्त आनंद आईला असतो.

-मनीषा पतंगे

मुलांना शाळेत काय शाळेच्या उंबरठ्यापर्यंतही पाठवावे वाटत नाही. कोरोना कोरोना महामारी काही सांगून येत नाही. त्यामुळे घाई न केलेली बरी असे प्रत्येक मुला-मुलींच्या आईला वाटते. काळजी आहे पण शिक्षणही गरजेचे आहे.

- सुरेखा कल्याणकर

बॉक्स....

जिल्ह्यात आठवीच्या प्राथमिक शाळा ८७९ असून आठवीचा वर्ग असलेल्या शाळा २७२ आहेत. आजमितीस सर्वच शाळा आपल्याला सुरु करायच्या नाहीत. सद्य:स्थितीत आठवीचा वर्ग सुरु करायचा आहे. आजमितीस या संदर्भात ७० प्रस्ताव आले असून २०२ शाळांचे प्रस्ताव येणे बाकी आहे. शासनाची जशी सूचना येईल त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल.

-संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी

ही घ्या काळजी...

शाळेतील मुलांनी तोंडाचा मास्क काढू नये, कोणत्याही वस्तूला हात लावला तरी साबनाने हात धुणे आवश्यक आहे, घरी असो वा शाळेत सॅनिटायझरचा वापर करावा, शाळेत सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, शाळेतून घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावे व स्वच्छपणे साबण लावून आंघोळ करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील एकूण शाळा ८७९

शाळेसाठी आलेले प्रस्ताव ७०

प्रस्ताव येणे बाकी २०२