शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यांच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा हद्दीच्या ...

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यांच्या वतीने मार्च २०२० पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा हद्दीच्या बाहेर कोणालाही जाता येत नव्हते. या काळात लहानापासून ते थोरापर्यंत तसेच अल्पवयीन मुलीसह सर्वचजण घरात अडकून पडले होते. मध्यंतरी काही दिवस निर्बंध शिथिल करण्यात आल्याने या काळात १७ मुली तर २०२१ मध्येही सुरुवातीचे तीन महिने निर्बंध शिथिल असल्यानेही या काळात १३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी अपहरण झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथकाला कामाला लावले आहे. दोन महिन्यापूर्वीच हिंगोलीतील एका अल्पवयीन मुलीचा काही तासातच शोध घेऊन पालकाच्या स्वाधीन केले होते.

अडीच वर्षांत ५६ पैकी ४७ बेपत्ता मुलींचा शोध लावण्यात यश

२०१९ मध्ये जिल्ह्यात २६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल २५ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तर केवळ एका मुलीचा शोध लावणे बाकी आहे. २०२० मध्ये १७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी पोलिसांनी १५ अल्पवयीन मुलींचा शोध लावला. तर दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. तसेच २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत १३ अल्पवयीन मुली बेपत्ता असून यापैकी ७ मुलीना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर ६ अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यासाठी पोलिसांचे पथक कामाला लावले आहे.

अंमलदारांसह सायबरसेलचे पथक कामाला

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली तर तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. यातून एखादा धागा हाती लागला की शोध घेणे सुलभ होते. बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध सायबर सेलच्या मदतीने तपास अंमलदार घेत आहेत. तसेच नातेवाईकांनाही अल्पवयीन मुलीबाबतची माहिती वेळीच पोलिसांना दिल्यास अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना मदत होईल.

बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासंदर्भात तपास अंमलदारांसह सायबर सेलच्या पथकाला सूचना दिल्या आहेत. पालकांनीही घरात विश्वासाचे, आपलेपणाचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. तसेच आपला पाल्य काय करतोय, याकडे लक्ष दिल्यास अशा घटना टाळता येतील.

-यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगाेली