शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सभापतीपदासाठी अजूनही बैठकांवर बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांनी मागच्या वेळी बंडखोरी करून हे पद मिळविले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारणच बदलून गेले ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांनी मागच्या वेळी बंडखोरी करून हे पद मिळविले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारणच बदलून गेले होते. शिवाय त्यांच्या वाट्याला कृषी सभापतीपद येण्याची शक्यता असताना तेथेही त्यांनी खेळी खेळून शेवटी शिक्षण सभापतीपद पदरात पाडून घेतले. मात्र, ज्या सदस्यांच्या मदतीवर हे घडले, तेच विरोधात गेल्याने शेवटी पदही गमवावे लागले. मात्र, मागच्या निवडीच्या वेळी झालेल्या एकंदर राजकारणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शिवाय अनेक सदस्यांच्या निष्ठा बदललेल्या असल्याने यावेळी काहीतरी विपरित घडण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या वर्तुळातून वर्तविली जात आहे. मात्र, संख्याबळाचा हा खेळ जुळविणे तेवढे सोपे नसून, यात शिवसेनाच शेवटी किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे, हे स्पष्ट आहे. शिवसेनेकडून ज्या नावाला हिरवी झेंडी मिळाली, त्याला राष्ट्रवादीने पुढे केले तर सगळे काही सुरळीत होण्याची शक्यता आहे. तसेही काँग्रेसचे कैलास साळुंके यांनीही आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची ही धडपड त्यांना कुठे घेऊन जाते, हे सगळे भाजपच्या निर्णयावर अवलंबून आहे.

जिल्हा परिषदेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना १५, राष्ट्रवादी काँग्रेस ११, भाजप ११, अपक्ष ३ व काँग्रेसच्या स्व. राजीव सातव गटाचे ७, तर भाऊराव पाटील गोरेगावकर गटाचे ३ असे ५० सदस्य आहेत. अविश्वासाच्या वेळी शिवसेना फुटली होती, तर भाजपमध्येही एकजूट दिसली नाही. मात्र, शिवसेनेची एकजूट राहिली तर दोन अपक्षांसह १७ पर्यंत संख्याबळ जाते. शिवाय गोरेगावकर गटही त्यांच्या सोबतच जाण्याची शक्यता आहे. बहुमताचा २६ हा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीचे सहा सदस्य कधीही एकत्र राहतील, यात शंका नाही. राष्ट्रवादीच्याच चव्हाण यांना बाजूला सारलेले असल्याने त्यांची नाराजी त्या कशा पद्धतीने दर्शवितात, यावर आकड्यात वाढ होण्याची भिस्त आहे, तर या पदावर दावा करणारेही काही नाराजीत गेले तरीही अडचणीचे ठरण्याची भीती नाही. मात्र, साळुंके यांनी सुरुंग लावण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांत ते कितपत यशस्वी होतील? हे अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीकडून आता यशोदा दराडे, संजय कावरखे, रिता दळवी यांच्यासह महादेव एकलारे यांचेही नाव समोर येत आहे.

दोन दिवसांपासून बैठका

या निवडीच्या वेळी सर्वच पक्षांची सावध भूमिका आहे. दोन दिवसांपासून त्यामुळे बैठकांवर बैठका झडत आहेत. प्रत्येकवेळी भाजप महाविकास आघाडीत बिघाडी कशी होईल, याची गणिते आखत जाते. त्यात त्यांना दोनदा बऱ्यापैकी यश आले. यावेळीही त्यांची तीच भूमिका दिसत आहे. तर सातव गट बाजूला पडल्याने तशीही महाविकास आघाडीत बिघाडीच आहे. मात्र, त्यांच्या नसण्यानेही गणित बिघडू नये, यासाठी या बैठका झडत असल्याचे दिसत आहे. अंतिम टप्प्यात दराडे व एकलारे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. अजून शिक्कामोर्तब मात्र झाले नाही.