शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विवाह, सत्यनारायणापासून तेराव्यापर्यंत ऑनलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोना महामारी अजूनही कमी झालेली नाही. हे पाहून शासनाने तीन - चार महिन्यांपासून धार्मिक विधी तसेच विवाह ...

हिंगोली : कोरोना महामारी अजूनही कमी झालेली नाही. हे पाहून शासनाने तीन - चार महिन्यांपासून धार्मिक विधी तसेच विवाह समारंभाला काही नियम घातले आहेत. आजमितीस छोटे जिल्हे वगळता इतर मोठ्या जिल्ह्यांमध्ये विवाह, सत्यनारायण पूजेपासून तेराव्याचे कायर्यक्रम हे ऑनलाइन झाले आहेत.

कोरोनामुळे राज्य शासनाने धार्मिक कार्यक्रमांना अजूनही सार्वजनिकरीत्या परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांत धार्मिक कार्यक्रम हे ऑनलाइन होत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यात सद्य:स्थितीत तरी कोणतेच कार्यक्रम ऑनलाइन सुरू नाहीत. कोरोनाचे नियम पाळत पुरोहित मंडळी सत्यनारायण, उदकशांती, सत्यअंबा, गृहप्रवेश आदी कार्यक्रम यजमानांना बोलावून कमी लोकांमध्ये आटोपून घेत आहेत.

कोरोना महामारी ओसरत चालली असला तरी रुग्ण हे वरचेवर आढळून येत आहेत. त्यामुळे पूजा-पाठ सांगते वेळेस पुरोहित मास्क घालूनच पूजा सांगत आहेत. जे यजमान पूजेला बसत आहेत, त्यांनाही पुरोहित मास्क घालण्याच्या सूचना करून विधी सांगताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया- बॉक्स

मोठे शहर वगळता छोट्या शहरात ऑफलाइन

शासनाने सार्वजनिकरीत्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. मोठ्या शहरात वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे यजमान हे पुरोहितांकडून ऑनलाइन कार्यक्रम करून घेत आहेत. त्याप्रमाणे पुरोहित हे ऑनलाइन पूजापाठ सांगण्यास सुरुवात करीत आहेत.

पूजेला आले तरी मास्क

राज्य शासनाने धार्मिक विधींना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पुरोहित मंडळी स्वत: मास्क घालून पूजा ऐकायला आलेल्या मंडळींनाही मास्कचे बंधन घालत आहेत. पूजेसाठी येणाऱ्या मंडळींनी प्रवेशद्वारात ठेवलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करून आत प्रवेश करण्यास सांगितले जात आहे. लहान असो किंवा मोठे सर्वांना मास्क आवश्यक आहे.

काय म्हणतात विधी करणारे...

राज्य शासनाने धार्मिक विधींना अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सत्यनारायण, अभिषेक, उदकशांती, गृहप्रवेश आदी छोटे-मोठे कार्यक्रम घेण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. शासनाने परवानगी देणे गरजेचे आहे.

- रेणुकादासराव कुलकर्णी, पुरोहित

जिल्ह्यातील काही पुरोहितांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे सत्यनारायण, अभिषेक आदी कार्यक्रम आहेत. गत दीड वर्षापासून हे सर्वच धार्मिक कार्मक्रम बंद आहेत. पुरोहितांचा राज्य शासनाने विचार करावा.

- संतोष अगस्ती, पुरोहित