शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मंडईत भेंडी ६०, तर कांदा १५ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST

हिंगोली : शहरातील मंडईत रविवारी काही भाज्या स्वस्त तर काही भाज्या महाग विकल्याचे पहायला मिळाले. २६ एप्रिलपासून पाच दिवस ...

हिंगोली : शहरातील मंडईत रविवारी काही भाज्या स्वस्त तर काही भाज्या महाग विकल्याचे पहायला मिळाले. २६ एप्रिलपासून पाच दिवस मंडई बंद राहणार असल्याने रविवारी अनेक ठोक व किरकोळ विक्रेत्यांनी भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे पहायला मिळाले. ग्राहकी मंडईत भाज्या खरेदीसाठी आले होते.

कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढू लागले आहेत. अनेक नागरिक व भाजीविक्रेते नियमांचे पालन करीत नसल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने पाच दिवस मंडई बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे. त्याप्रमाणे येत्या पाच दिवसांपर्यंत मंडई बंद ठेवली जाणार आहे. रविवारी मंडईत भेंडी ६०, चवळी ४० रुपये, काकडी ३० रुपये किलो, आलू २० रुपये किलो, कांदा १५ रुपये किलो, पालक १० रुपयास जुडी, लिंबू १० रुपयास चार, दोडके, कारले, वांगे, शेवगा दहा रुपयांस पाव, गवार १५, कांदे १५ रुपये किलोप्रमाणे विकले गेले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी भाज्यांची आवक चांगली आहे. संचारबंदीचे कारण देत काही भाजीविक्रेत्यांनी भाज्यांचे भाव वाढविल्याचे पहायला मिळाले.

बाजारात अंगूर, चिकू, नारळ, टरबूज आदी फळांची आवक कमीच होती. अंगूर ८०, चिकू ८०, नारळ ६०, टरबूज २० रुपये किलोप्रमाणे विकले गेले. आंबा, डाळिंब, अननस आदी फळांची आवक जास्त असली तरी भावही वाढलेले पहायला मिळाले. आंबे १२५ ते १५०, डाळिंब २५०, अननस ८० ते ९० रुपये किलोप्रमाणे भाव होता.

प्रतिक्रिया

सोमवारपासून पाच दिवस भाजीमंडई बंद राहणार आहे. तेव्हा भाजीविक्रेत्यांनी भाजीखरेदी करून कुठे विकावी. कारण मंडई बंद राहणार असून, शहरात भाजी विकता येणार नाही. यामुळे भाज्यांची नासाडी होणे साहजिक आहे.

-शेख मुजीब, भाजीविक्रेता

उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे फळांना मागणीही वाढली आहे. परंतु, फळे घेऊन कुठे विक्री करावी? असा प्रश्न फळविक्रेत्यांना पडला आहे. फळ विक्री जागा बदलली की ग्राहक येत नाहीत. संचारबंदीमुळे ठराविक, अशी जागा फळविक्रेत्यांना राहिली नाही.

-मोईन बागवान, फळविक्रेता