शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंडईत भेंडी ६०, तर कांदा १५ रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST

हिंगोली : शहरातील मंडईत रविवारी काही भाज्या स्वस्त तर काही भाज्या महाग विकल्याचे पहायला मिळाले. २६ एप्रिलपासून पाच दिवस ...

हिंगोली : शहरातील मंडईत रविवारी काही भाज्या स्वस्त तर काही भाज्या महाग विकल्याचे पहायला मिळाले. २६ एप्रिलपासून पाच दिवस मंडई बंद राहणार असल्याने रविवारी अनेक ठोक व किरकोळ विक्रेत्यांनी भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे पहायला मिळाले. ग्राहकी मंडईत भाज्या खरेदीसाठी आले होते.

कोरोनाचे रुग्ण दिवसागनिक वाढू लागले आहेत. अनेक नागरिक व भाजीविक्रेते नियमांचे पालन करीत नसल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने पाच दिवस मंडई बंद ठेवण्याचे आदेशित केले आहे. त्याप्रमाणे येत्या पाच दिवसांपर्यंत मंडई बंद ठेवली जाणार आहे. रविवारी मंडईत भेंडी ६०, चवळी ४० रुपये, काकडी ३० रुपये किलो, आलू २० रुपये किलो, कांदा १५ रुपये किलो, पालक १० रुपयास जुडी, लिंबू १० रुपयास चार, दोडके, कारले, वांगे, शेवगा दहा रुपयांस पाव, गवार १५, कांदे १५ रुपये किलोप्रमाणे विकले गेले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी भाज्यांची आवक चांगली आहे. संचारबंदीचे कारण देत काही भाजीविक्रेत्यांनी भाज्यांचे भाव वाढविल्याचे पहायला मिळाले.

बाजारात अंगूर, चिकू, नारळ, टरबूज आदी फळांची आवक कमीच होती. अंगूर ८०, चिकू ८०, नारळ ६०, टरबूज २० रुपये किलोप्रमाणे विकले गेले. आंबा, डाळिंब, अननस आदी फळांची आवक जास्त असली तरी भावही वाढलेले पहायला मिळाले. आंबे १२५ ते १५०, डाळिंब २५०, अननस ८० ते ९० रुपये किलोप्रमाणे भाव होता.

प्रतिक्रिया

सोमवारपासून पाच दिवस भाजीमंडई बंद राहणार आहे. तेव्हा भाजीविक्रेत्यांनी भाजीखरेदी करून कुठे विकावी. कारण मंडई बंद राहणार असून, शहरात भाजी विकता येणार नाही. यामुळे भाज्यांची नासाडी होणे साहजिक आहे.

-शेख मुजीब, भाजीविक्रेता

उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे फळांना मागणीही वाढली आहे. परंतु, फळे घेऊन कुठे विक्री करावी? असा प्रश्न फळविक्रेत्यांना पडला आहे. फळ विक्री जागा बदलली की ग्राहक येत नाहीत. संचारबंदीमुळे ठराविक, अशी जागा फळविक्रेत्यांना राहिली नाही.

-मोईन बागवान, फळविक्रेता