शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

हिंगोली : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्या. त्यामुळेच मराठा ...

हिंगोली : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्या. त्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेल्याचा आरोप आ. श्वेताताई महाले पाटील यांनी केला.

हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बाेलत होत्या. यावेळी भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. रामराव वडकुते, गजानन घुगे, जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, खंडेराव सरनाईक, भूषण देशमुख, मनोज आखरे, संभाजी पाटील, फुलाजी देशमुख, प्रकाश थोरात, अमोल जाधव, रजनी पाटील, यशोदाताई कोरडे, सुनंदा मिश्रा, कृष्णा रूहटीया, अभिषेक अग्रवाल, करण भंसाळी, आदींची उपस्थिती होती. यावेळी महाले म्हणाल्या, मराठा आरक्षणाचा तीस वर्षे लढा सुरू होता. अखेरीस फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयातही टिकले. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अनेक गंभीर चुका केल्या. योग्य रीतीने बाजू मांडली गेली नाही. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही. त्यामुळेच आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल. त्यामध्ये गायकवाड आयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या मुद्द्याचे उत्तर असावे, त्या नंतर तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. त्यांच्या मंजुरीनंतर तो राष्ट्रपतींकडे जाईल व त्यांच्या मंजुरीनंतर राज्याला मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा पुन्हा करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र, त्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाचे गठण करण्यासह कोणतेही पाऊल महाविकास आघाडी सरकार उचलत नाही. केवळ पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन देऊन मराठा समाजाची दिशाभूल करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तीन हजार कोटी रुपयांचे पॅकेज मराठा समाजाला द्यावे, तसेच आरक्षण रद्द होण्यापूर्वी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही महाले यांनी केली.