शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

हिंगोली : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्या. त्यामुळेच मराठा ...

हिंगोली : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्या. त्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेल्याचा आरोप आ. श्वेताताई महाले पाटील यांनी केला.

हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात १ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बाेलत होत्या. यावेळी भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. रामराव वडकुते, गजानन घुगे, जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव, खंडेराव सरनाईक, भूषण देशमुख, मनोज आखरे, संभाजी पाटील, फुलाजी देशमुख, प्रकाश थोरात, अमोल जाधव, रजनी पाटील, यशोदाताई कोरडे, सुनंदा मिश्रा, कृष्णा रूहटीया, अभिषेक अग्रवाल, करण भंसाळी, आदींची उपस्थिती होती. यावेळी महाले म्हणाल्या, मराठा आरक्षणाचा तीस वर्षे लढा सुरू होता. अखेरीस फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. ते उच्च न्यायालयातही टिकले. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अनेक गंभीर चुका केल्या. योग्य रीतीने बाजू मांडली गेली नाही. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही. त्यामुळेच आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल. त्यामध्ये गायकवाड आयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या मुद्द्याचे उत्तर असावे, त्या नंतर तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. त्यांच्या मंजुरीनंतर तो राष्ट्रपतींकडे जाईल व त्यांच्या मंजुरीनंतर राज्याला मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा पुन्हा करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला. मात्र, त्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाचे गठण करण्यासह कोणतेही पाऊल महाविकास आघाडी सरकार उचलत नाही. केवळ पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन देऊन मराठा समाजाची दिशाभूल करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तीन हजार कोटी रुपयांचे पॅकेज मराठा समाजाला द्यावे, तसेच आरक्षण रद्द होण्यापूर्वी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही महाले यांनी केली.