शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

कोरोना महामारीमुळे महामंडळाची ‘शिवशाही’ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

हिंगोली: गत दीड वर्षाापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार केला आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ बस चालविणे कठीण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ...

हिंगोली: गत दीड वर्षाापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार केला आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ बस चालविणे कठीण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनानेच फेब्रुवारी २०२१ पासून ‘शिवशाही’ बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

एस. टी. महामंडळाच्या हिंगोली आगारात ५ ‘शिवशाही’ बसेस कार्यरत आहेत. परंतु, २३ मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. कोरोना महामारीच्या आधी ‘शिवशाही’ बसचे उत्पन्न दिवसांकाठी रोज ५५ ते ६० हजारांच्या घरात होते. परंतु, कोरोनामुळे यात खूप घट झाली असून, २० हजार रुपयेही पदरात पडेनासे झाले.

हिंगोली आगारातून सकाळी आणि सायंकाळी हिंगोली - पुणे ‘शिवशाही’ बसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. परंतु, कोरोनाची दृष्ट लागल्याने शासनाला अखेर ही बस बंद करावी लागली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे उत्पन्न तर सोडा साधा डिझेलचा खर्च निघेनासा झाला आहे.

महामंडळास एवढी ‘शिवशाही’ बस चालविणे कठीण झाले होते. अखेर शासनाने याचा विचार करून कोरोना संपेपर्यंत शिवशाही बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळेस कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर होईल तेव्हाच ‘शिवशाही’ बस सुरू केली जाईल, अशी सूचनाही शासनाने महामंडळाला दिली आहे.

कोरोना आधी आरक्षण व्हायचे...

कोरोना आधी ‘शिवशाही’मार्फत एस. टी. महामंडळास चांगले उत्पन्न मिळायचे. परंतु, आजमितीस अशी परिस्थिती आहे की, उत्पन्न तर सोडा प्रवासीही मिळेना झाले आहेत. आरक्षण तर मार्च २०२० पासून बंदच आहे. या अगोदर ‘शिवशाही’साठी आरक्षण होत असे. आरक्षणातून एस. टी. महामंडळाला चांगला नफाही व्हायचा. कोरोनामुळे होत्याचे नव्हते असेच झाले आहे. ‘शिवशाही’तून महिनाकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे.

लांब पल्ल्याच्या बसेसही बंदच

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेसही बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बसेस बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा तसा आदेश आहे. हैदराबाद, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. शासनाचे जसे आदेश येतील, त्या प्रमाणे महामंडळ बसेस सुरू करेल. आजमितीस तरी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन एस. टी. महामंडळ काटेकोरपणे करीत आहे.

-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली