शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

महालक्ष्मी सणाचा बाजार फुलला; भाज्या मात्र कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० ...

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० रुपये किलो दराने विकल्या गेल्या. महालक्ष्मी सणाच्या दिवशीच भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांशी घासघीस करताना दिसून आले.

कोरोना महामारीमुळे दीड वर्ष महालक्ष्मी सणाचा बाजार भरला गेला नाही. परंतु, या वेळेस जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रविवारी ज्येष्ठागौरीला आवाहन असल्यामुळे बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गतवर्षी महालक्ष्मींच्या मुखवट्यांचा दर ५०० रुपये होता. परंतु, या वेळेस तो वाढला गेला असून ८०० रुपयाला मुखवट्यांची जोडी असा भाव राहिला. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० रुपये होते. या वेळेस ८०० ते ८५० रुपयांवर कोथळ्यांचे भाव पोहोचले होते. शहरातील गांधी चौक, महावीर चौक या गजबजलेल्या ठिकाणी जवळपास १५ विक्रेत्यांनी मुखवटे व सजावटींच्या साहित्यांची दुकाने थाटली होती.

फुलांचे हारही महागले...

सद्य:स्थितीत शहरात फुलांची आवक बऱ्यापैकी असली तरी महालक्ष्मी सण लक्षात घेऊन सुट्या फुलांबरोबर फुलांचे हारही महागले होते. २० रुपयाला मिळणारा साधा फुलांचा हार ५० ते ६० रुपयाला विकला गेला. .... रुपयांपासून .... रुपयांपर्यंत फुलांचे दर असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.

टोमॅटो मात्र १० रुपये किलो...

महालक्ष्मी सणाच्या तोंडावर इतर भाज्या महागल्या असल्या तरी टोमॅटो मात्र १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेले. यामुळे ग्राहकांचा ओढा टोमॅटोकडे जास्त असल्याचे भाजी मंडईत पाहायला मिळाले.

भाज्या कडाडल्या...

गवार शेंग ८० रुपये किलो

वांगे ६० रुपये किलो

चवळी ६० रुपये किलो

दोडके ४० रुपये किलो

वॉलाच्या शेंगा ४० रुपये किलो

फुलकोबी ४० रुपये किलो

कारले ४० रुपये किलो

बीटरुट ४० रुपये किलो

भेंडी ३० रुपये किलो

ढोबळ मिरची ३० रुपये किलो

पानकोबी २० रुपये किलो

पालक २० रुपये जुडी

भाजी व्यवसाय करणे झाले कठीण...

भाज्यांचे उत्पादन चांगले होत असले तरी पावसामुळे भाज्या मंडईत आणणे शक्य होत नाही. अर्ध्याअधिक भाज्या काढणी करतेवेळेस खराब होत आहेत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सणासुदीला भाजीपाल्याचे दर वाढल्याची प्रतिक्रिया पंढरी थोरात व विशाल सातव यांनी दिली.

प्रतिक्रिया...

महालक्ष्मी सणाला भाज्या स्वस्त होतील, असे वाटले होते. परंंतु महालक्ष्मी आवाहनालाच भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. यामुळे एकच भाजी महालक्ष्मी सणाला घ्यावी लागली.

-सुरेखा कल्याणकर, गृहिणी

सणासुदीचे दिवस असल्यामुळे भाजी मंडईत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गल्लीत आलेल्या हातगाड्यांवर भाजी घ्यावी म्हटले तर छोटे विक्रेते अव्वाच्या सव्वा भाज्यांचे भाव सांगतात. त्यामुळे सणालाही भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागतो.

-शिल्पा रोकडे, गृहिणी

-