शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

महालक्ष्मी सणाचा बाजार फुलला; भाज्या मात्र कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० ...

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० रुपये किलो दराने विकल्या गेल्या. महालक्ष्मी सणाच्या दिवशीच भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांशी घासघीस करताना दिसून आले.

कोरोना महामारीमुळे दीड वर्ष महालक्ष्मी सणाचा बाजार भरला गेला नाही. परंतु, या वेळेस जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रविवारी ज्येष्ठागौरीला आवाहन असल्यामुळे बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गतवर्षी महालक्ष्मींच्या मुखवट्यांचा दर ५०० रुपये होता. परंतु, या वेळेस तो वाढला गेला असून ८०० रुपयाला मुखवट्यांची जोडी असा भाव राहिला. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० रुपये होते. या वेळेस ८०० ते ८५० रुपयांवर कोथळ्यांचे भाव पोहोचले होते. शहरातील गांधी चौक, महावीर चौक या गजबजलेल्या ठिकाणी जवळपास १५ विक्रेत्यांनी मुखवटे व सजावटींच्या साहित्यांची दुकाने थाटली होती.

फुलांचे हारही महागले...

सद्य:स्थितीत शहरात फुलांची आवक बऱ्यापैकी असली तरी महालक्ष्मी सण लक्षात घेऊन सुट्या फुलांबरोबर फुलांचे हारही महागले होते. २० रुपयाला मिळणारा साधा फुलांचा हार ५० ते ६० रुपयाला विकला गेला. .... रुपयांपासून .... रुपयांपर्यंत फुलांचे दर असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.

टोमॅटो मात्र १० रुपये किलो...

महालक्ष्मी सणाच्या तोंडावर इतर भाज्या महागल्या असल्या तरी टोमॅटो मात्र १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेले. यामुळे ग्राहकांचा ओढा टोमॅटोकडे जास्त असल्याचे भाजी मंडईत पाहायला मिळाले.

भाज्या कडाडल्या...

गवार शेंग ८० रुपये किलो

वांगे ६० रुपये किलो

चवळी ६० रुपये किलो

दोडके ४० रुपये किलो

वॉलाच्या शेंगा ४० रुपये किलो

फुलकोबी ४० रुपये किलो

कारले ४० रुपये किलो

बीटरुट ४० रुपये किलो

भेंडी ३० रुपये किलो

ढोबळ मिरची ३० रुपये किलो

पानकोबी २० रुपये किलो

पालक २० रुपये जुडी

भाजी व्यवसाय करणे झाले कठीण...

भाज्यांचे उत्पादन चांगले होत असले तरी पावसामुळे भाज्या मंडईत आणणे शक्य होत नाही. अर्ध्याअधिक भाज्या काढणी करतेवेळेस खराब होत आहेत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सणासुदीला भाजीपाल्याचे दर वाढल्याची प्रतिक्रिया पंढरी थोरात व विशाल सातव यांनी दिली.

प्रतिक्रिया...

महालक्ष्मी सणाला भाज्या स्वस्त होतील, असे वाटले होते. परंंतु महालक्ष्मी आवाहनालाच भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. यामुळे एकच भाजी महालक्ष्मी सणाला घ्यावी लागली.

-सुरेखा कल्याणकर, गृहिणी

सणासुदीचे दिवस असल्यामुळे भाजी मंडईत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गल्लीत आलेल्या हातगाड्यांवर भाजी घ्यावी म्हटले तर छोटे विक्रेते अव्वाच्या सव्वा भाज्यांचे भाव सांगतात. त्यामुळे सणालाही भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागतो.

-शिल्पा रोकडे, गृहिणी

-