शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी सणाचा बाजार फुलला; भाज्या मात्र कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० ...

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० रुपये किलो दराने विकल्या गेल्या. महालक्ष्मी सणाच्या दिवशीच भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांशी घासघीस करताना दिसून आले.

कोरोना महामारीमुळे दीड वर्ष महालक्ष्मी सणाचा बाजार भरला गेला नाही. परंतु, या वेळेस जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रविवारी ज्येष्ठागौरीला आवाहन असल्यामुळे बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गतवर्षी महालक्ष्मींच्या मुखवट्यांचा दर ५०० रुपये होता. परंतु, या वेळेस तो वाढला गेला असून ८०० रुपयाला मुखवट्यांची जोडी असा भाव राहिला. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० रुपये होते. या वेळेस ८०० ते ८५० रुपयांवर कोथळ्यांचे भाव पोहोचले होते. शहरातील गांधी चौक, महावीर चौक या गजबजलेल्या ठिकाणी जवळपास १५ विक्रेत्यांनी मुखवटे व सजावटींच्या साहित्यांची दुकाने थाटली होती.

फुलांचे हारही महागले...

सद्य:स्थितीत शहरात फुलांची आवक बऱ्यापैकी असली तरी महालक्ष्मी सण लक्षात घेऊन सुट्या फुलांबरोबर फुलांचे हारही महागले होते. २० रुपयाला मिळणारा साधा फुलांचा हार ५० ते ६० रुपयाला विकला गेला. .... रुपयांपासून .... रुपयांपर्यंत फुलांचे दर असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.

टोमॅटो मात्र १० रुपये किलो...

महालक्ष्मी सणाच्या तोंडावर इतर भाज्या महागल्या असल्या तरी टोमॅटो मात्र १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेले. यामुळे ग्राहकांचा ओढा टोमॅटोकडे जास्त असल्याचे भाजी मंडईत पाहायला मिळाले.

भाज्या कडाडल्या...

गवार शेंग ८० रुपये किलो

वांगे ६० रुपये किलो

चवळी ६० रुपये किलो

दोडके ४० रुपये किलो

वॉलाच्या शेंगा ४० रुपये किलो

फुलकोबी ४० रुपये किलो

कारले ४० रुपये किलो

बीटरुट ४० रुपये किलो

भेंडी ३० रुपये किलो

ढोबळ मिरची ३० रुपये किलो

पानकोबी २० रुपये किलो

पालक २० रुपये जुडी

भाजी व्यवसाय करणे झाले कठीण...

भाज्यांचे उत्पादन चांगले होत असले तरी पावसामुळे भाज्या मंडईत आणणे शक्य होत नाही. अर्ध्याअधिक भाज्या काढणी करतेवेळेस खराब होत आहेत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सणासुदीला भाजीपाल्याचे दर वाढल्याची प्रतिक्रिया पंढरी थोरात व विशाल सातव यांनी दिली.

प्रतिक्रिया...

महालक्ष्मी सणाला भाज्या स्वस्त होतील, असे वाटले होते. परंंतु महालक्ष्मी आवाहनालाच भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. यामुळे एकच भाजी महालक्ष्मी सणाला घ्यावी लागली.

-सुरेखा कल्याणकर, गृहिणी

सणासुदीचे दिवस असल्यामुळे भाजी मंडईत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गल्लीत आलेल्या हातगाड्यांवर भाजी घ्यावी म्हटले तर छोटे विक्रेते अव्वाच्या सव्वा भाज्यांचे भाव सांगतात. त्यामुळे सणालाही भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागतो.

-शिल्पा रोकडे, गृहिणी

-