शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी सणाचा बाजार फुलला; भाज्या मात्र कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० ...

हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० रुपये किलो दराने विकल्या गेल्या. महालक्ष्मी सणाच्या दिवशीच भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांशी घासघीस करताना दिसून आले.

कोरोना महामारीमुळे दीड वर्ष महालक्ष्मी सणाचा बाजार भरला गेला नाही. परंतु, या वेळेस जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रविवारी ज्येष्ठागौरीला आवाहन असल्यामुळे बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गतवर्षी महालक्ष्मींच्या मुखवट्यांचा दर ५०० रुपये होता. परंतु, या वेळेस तो वाढला गेला असून ८०० रुपयाला मुखवट्यांची जोडी असा भाव राहिला. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० रुपये होते. या वेळेस ८०० ते ८५० रुपयांवर कोथळ्यांचे भाव पोहोचले होते. शहरातील गांधी चौक, महावीर चौक या गजबजलेल्या ठिकाणी जवळपास १५ विक्रेत्यांनी मुखवटे व सजावटींच्या साहित्यांची दुकाने थाटली होती.

फुलांचे हारही महागले...

सद्य:स्थितीत शहरात फुलांची आवक बऱ्यापैकी असली तरी महालक्ष्मी सण लक्षात घेऊन सुट्या फुलांबरोबर फुलांचे हारही महागले होते. २० रुपयाला मिळणारा साधा फुलांचा हार ५० ते ६० रुपयाला विकला गेला. .... रुपयांपासून .... रुपयांपर्यंत फुलांचे दर असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.

टोमॅटो मात्र १० रुपये किलो...

महालक्ष्मी सणाच्या तोंडावर इतर भाज्या महागल्या असल्या तरी टोमॅटो मात्र १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेले. यामुळे ग्राहकांचा ओढा टोमॅटोकडे जास्त असल्याचे भाजी मंडईत पाहायला मिळाले.

भाज्या कडाडल्या...

गवार शेंग ८० रुपये किलो

वांगे ६० रुपये किलो

चवळी ६० रुपये किलो

दोडके ४० रुपये किलो

वॉलाच्या शेंगा ४० रुपये किलो

फुलकोबी ४० रुपये किलो

कारले ४० रुपये किलो

बीटरुट ४० रुपये किलो

भेंडी ३० रुपये किलो

ढोबळ मिरची ३० रुपये किलो

पानकोबी २० रुपये किलो

पालक २० रुपये जुडी

भाजी व्यवसाय करणे झाले कठीण...

भाज्यांचे उत्पादन चांगले होत असले तरी पावसामुळे भाज्या मंडईत आणणे शक्य होत नाही. अर्ध्याअधिक भाज्या काढणी करतेवेळेस खराब होत आहेत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सणासुदीला भाजीपाल्याचे दर वाढल्याची प्रतिक्रिया पंढरी थोरात व विशाल सातव यांनी दिली.

प्रतिक्रिया...

महालक्ष्मी सणाला भाज्या स्वस्त होतील, असे वाटले होते. परंंतु महालक्ष्मी आवाहनालाच भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. यामुळे एकच भाजी महालक्ष्मी सणाला घ्यावी लागली.

-सुरेखा कल्याणकर, गृहिणी

सणासुदीचे दिवस असल्यामुळे भाजी मंडईत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गल्लीत आलेल्या हातगाड्यांवर भाजी घ्यावी म्हटले तर छोटे विक्रेते अव्वाच्या सव्वा भाज्यांचे भाव सांगतात. त्यामुळे सणालाही भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागतो.

-शिल्पा रोकडे, गृहिणी

-