शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

कृषी पायाभूत सुविधेतून मिळणर २ काेटीपर्यंत कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

हिंगोली : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार ...

हिंगोली : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषी मूलभूत सुविधा अंतर्गत २ कोटी रुपयापर्यत कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेसाठी कर्जाचा कालावधी सात वर्ष असून वार्षिक व्याजदरावर ३ टक्के सूट देण्यात आली आहे. सदरील योजनेत कापनीनंतरच्या व्यवस्थापनासाचे प्रकल्प समाविष्ट केले आहेत. यात मार्केटींग प्लॅटफाॅर्म, गोदाम, पॅक हाऊस, मुरघास, संकलन केंद्र, वर्गवारी आणि प्रतवारी गृह, शीतगृह, पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायनिंग चेंबर तसेच सामूहिक शेतीकरीता आवश्यक सेंद्रीय उत्पादने, जैविक निविष्ठा उत्पादन प्रकल्पाचा समावेश केला आहे.

वित्तपुरवठा कोण घेऊ शकते...

प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं सहायता गट, संयुक्त उत्तरदायीत्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स आणि केंद्र, राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खाजगी भागिदारी प्रकल्प.

सहभाग घेण्यासाठीची प्रक्रिया...

अर्जदाराने ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्यास अधिकारपत्र मिळेल, अर्जदार लाभार्थी कर्जासाठी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, अर्जासोबत प्रकल्प अहवालाची मूळप्रत आणि प्रकल्प अहवालाशी संबंधित कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे, कर्ज देणारी संस्था या प्रकल्पाचे मूल्यांकन करुन प्रकल्पाच्या व्यवहार्यतेनुसार कर्ज मंजूर करावे किंवा प्रकल्प नाकारणे याबाबत निर्णय घेईल,कर्ज मंजूर झाल्यानंतर निधी लाभार्थीच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्यात येईल.